शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:36 IST

उमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले.

कोल्हापूर : सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेला सोमवारी (दि. २१) मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले असून, सोमवारी दुपारपासूनच उमेदवारांनी राजाराम कॉलेजच्या मैदानावर गर्दी केली. १३ डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.सैन्य दलातील अग्निवीर भरतीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यासह गोवा राज्यातील सुमारे ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील उमेदवारांना भरतीसाठी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांनी सोमवारी दुपारपासूनच राजाराम कॉलेजच्या मैदानात गर्दी केली होती.कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या कक्षासमोर जागा मिळेल तिथे उमेदवारांनी काही काळ विश्रांती घेतली. मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.भरती प्रक्रियेला येणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी मैदानावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था केली आहे. तसेच दोन्ही मैदानांवर पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाइट आर्मीकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी केवळ १५५३ उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवल्यामुळे भरतीच्या ठिकाणी कुठेही गर्दी किंवा गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही.अकॅडमींचा पुढाकारसैन्य भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक उमेदवार अकॅडमींमध्ये सराव करतात. अकॅडमींनी स्वत:च्या वाहनांची व्यवस्था करून उमेदवारांना भरतीस्थळी पोहोचवले. त्यामुळे विविध अकॅडमीच्या चालकांचाही वावर भरतीस्थळी पाहायला मिळाला.रात्रभर चालली भरती प्रक्रियाउमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रभर भरती प्रक्रिया सुरू राहिली. रनिंगमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना केएमटीच्या बसमधून थेट मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत सोडण्यात आले.

मी पहिल्यांदाच भरतीसाठी आलो असून, प्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे. चांगली तयारी केली आहे. देशासाठी अग्निवीर बनू, अशी खात्री आहे. -सूरज निवाते, दापोली 

सैन्य भरतीसाठी मी वर्षभर अकॅडमीत सराव केला. मित्रांसोबत सोमवारी दुपारीच कोल्हापुरात आलो. प्रशासनाने भरतीसाठी चांगली तयारी केलेली दिसते. पूर्ण क्षमतेने भरती प्रक्रियेला सामोरे जाऊ. -आयुष नाईक, सावंतवाडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर