शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:36 IST

उमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले.

कोल्हापूर : सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेला सोमवारी (दि. २१) मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले असून, सोमवारी दुपारपासूनच उमेदवारांनी राजाराम कॉलेजच्या मैदानावर गर्दी केली. १३ डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.सैन्य दलातील अग्निवीर भरतीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यासह गोवा राज्यातील सुमारे ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील उमेदवारांना भरतीसाठी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांनी सोमवारी दुपारपासूनच राजाराम कॉलेजच्या मैदानात गर्दी केली होती.कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या कक्षासमोर जागा मिळेल तिथे उमेदवारांनी काही काळ विश्रांती घेतली. मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.भरती प्रक्रियेला येणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी मैदानावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था केली आहे. तसेच दोन्ही मैदानांवर पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाइट आर्मीकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी केवळ १५५३ उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवल्यामुळे भरतीच्या ठिकाणी कुठेही गर्दी किंवा गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही.अकॅडमींचा पुढाकारसैन्य भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक उमेदवार अकॅडमींमध्ये सराव करतात. अकॅडमींनी स्वत:च्या वाहनांची व्यवस्था करून उमेदवारांना भरतीस्थळी पोहोचवले. त्यामुळे विविध अकॅडमीच्या चालकांचाही वावर भरतीस्थळी पाहायला मिळाला.रात्रभर चालली भरती प्रक्रियाउमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रभर भरती प्रक्रिया सुरू राहिली. रनिंगमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना केएमटीच्या बसमधून थेट मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत सोडण्यात आले.

मी पहिल्यांदाच भरतीसाठी आलो असून, प्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे. चांगली तयारी केली आहे. देशासाठी अग्निवीर बनू, अशी खात्री आहे. -सूरज निवाते, दापोली 

सैन्य भरतीसाठी मी वर्षभर अकॅडमीत सराव केला. मित्रांसोबत सोमवारी दुपारीच कोल्हापुरात आलो. प्रशासनाने भरतीसाठी चांगली तयारी केलेली दिसते. पूर्ण क्षमतेने भरती प्रक्रियेला सामोरे जाऊ. -आयुष नाईक, सावंतवाडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर