शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:36 IST

उमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले.

कोल्हापूर : सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेला सोमवारी (दि. २१) मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले असून, सोमवारी दुपारपासूनच उमेदवारांनी राजाराम कॉलेजच्या मैदानावर गर्दी केली. १३ डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.सैन्य दलातील अग्निवीर भरतीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यासह गोवा राज्यातील सुमारे ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील उमेदवारांना भरतीसाठी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांनी सोमवारी दुपारपासूनच राजाराम कॉलेजच्या मैदानात गर्दी केली होती.कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या कक्षासमोर जागा मिळेल तिथे उमेदवारांनी काही काळ विश्रांती घेतली. मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.भरती प्रक्रियेला येणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी मैदानावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था केली आहे. तसेच दोन्ही मैदानांवर पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाइट आर्मीकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी केवळ १५५३ उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवल्यामुळे भरतीच्या ठिकाणी कुठेही गर्दी किंवा गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही.अकॅडमींचा पुढाकारसैन्य भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक उमेदवार अकॅडमींमध्ये सराव करतात. अकॅडमींनी स्वत:च्या वाहनांची व्यवस्था करून उमेदवारांना भरतीस्थळी पोहोचवले. त्यामुळे विविध अकॅडमीच्या चालकांचाही वावर भरतीस्थळी पाहायला मिळाला.रात्रभर चालली भरती प्रक्रियाउमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रभर भरती प्रक्रिया सुरू राहिली. रनिंगमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना केएमटीच्या बसमधून थेट मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत सोडण्यात आले.

मी पहिल्यांदाच भरतीसाठी आलो असून, प्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे. चांगली तयारी केली आहे. देशासाठी अग्निवीर बनू, अशी खात्री आहे. -सूरज निवाते, दापोली 

सैन्य भरतीसाठी मी वर्षभर अकॅडमीत सराव केला. मित्रांसोबत सोमवारी दुपारीच कोल्हापुरात आलो. प्रशासनाने भरतीसाठी चांगली तयारी केलेली दिसते. पूर्ण क्षमतेने भरती प्रक्रियेला सामोरे जाऊ. -आयुष नाईक, सावंतवाडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर