शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

पुन्हा दगडी पिठाचा वापर

By admin | Updated: January 17, 2015 00:07 IST

आदेशाला हरताळ : सासने मैदानाजवळच्या रस्त्यावरील प्रकार

कोल्हापूर : शहरात नव्याने सुरू असलेल्या रस्तेबांधणीचे काम दर्जेदार पद्धतीनेच झाले पाहिजे, यासाठी कनिष्ठ व सहायक अभियंत्यांनी रस्त्यांची दररोज पाहणी करावी. दगडी पिठाचा वापर टाळून योग्य प्रमाणात डांबरमिश्रित खडीच रस्त्यासाठी वापरली पाहिजे. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल, असा सक्त आदेश अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिला आहे; पण या आदेशाला ताराराणी विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांनी आज, शुक्रवारी केराची टोपली दाखविली. सासने मैदानाजवळील रस्त्यावर अल्प प्रमाणात डांबर वापरून सुरू असलेल्या रस्त्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करीत ताराराणी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केल्यानंतर यंत्रणेला जाग आली.शहरात १०८ कोटींचे नगरोत्थान योजना, तसेच विशेष निधीतून तब्बल १५० हून अधिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील एकही रस्ता वर्षापेक्षा अधिक काळ टिकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी रस्त्याच्या कामांची जबाबदारी निश्चित केली. सुरुवातीच्या काळात अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व विभागीय कार्यालयातील अभियंत्यांनी रस्त्याच्या कामांवर लक्ष ठेवण्याचा जुजबी प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षात ही कामे सुरू होताच अधिकाऱ्यांची ही फौज गायब झाली. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताच ठेकेदारांची आता मनमानी सुरू आहे. रस्त्यांसाठी योग्य प्रमाणात खडी व डांबर वापरले जात नाही. तरी महापालिकेचे कनिष्ठ अभियंते याकडे पूर्णत: दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सगळेच आलबेलरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या कारणास्तव परिसरातील नागरिकांनी ताराराणी विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली. यानंतर कामाची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना काम सुरू असल्याचे समजले. ‘अरेच्या! काम सुरू आहे का... पाहतो काय झाले ते...’ असे म्हणत कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी सासने मैदानाकडे धाव घेतली. अधिकारी प्रत्यक्ष पोहोचेपर्यंत ठेकेदाराने दिवसभरातील काम फत्ते केले होते.