शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दीड वर्षानंतर विमानाचे मुंबईहून कोल्हापूरकडे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:58 IST

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात : पहिल्या विमानातून ६३ प्रवासी आले महापुरामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळला

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

महापुराच्या छायेमुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळून ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन केले व केक कापण्यात आला. रखडलेली विमानसेवा सुुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा सुरू केली होती; परंतु कंपनीअंतर्गत अडचणींमुळे ती बंद पडली. त्यानंतर आजतागायत विमानसेवा सुरू झाली नव्हती. तिला रविवारी मुहूर्त मिळाला. दुपारी दीडच्या सुमारास ट्रू जेट कंपनीचे विमान येणार असल्याने मुंबईकडे जाणारे प्रवासी व मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्रमंडळी व प्राधिकरणाचे कर्मचारी यांमुळे हा परिसर फुलून गेला होता.

दुपारी २ वाजून २० मिनिटांंनी मुंबईहून ७२ आसनी विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे अग्निशमन दलाच्या बंबातून वॉटर शॉवर करीत या विमानाचे स्वागत करण्यात आले. विमानातून उतरलेल्या प्रवाशांचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

जिल्ह्यावर महापुराचे सावट असल्याने कोणताही झगमगाट किंवा मोठा सोहळा प्राधिकरणाच्या वतीने टाळण्यात आला. विमानतळावर छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केक कापण्यात आला. काही वेळातच हे विमान ४३ प्रवाशांना घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आपल्याला मनस्वी आनंद आहे. ही सेवा अशीच सुरूराहावी. मुंबईहून कोल्हापूरपर्यंतचा विमानप्रवास हा सुखकर व आनंददायी राहिला.- डॉ. डी. वाय. पाटील,माजी राज्यपाल

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरूझाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. या विमानसेवेत आता कोणताही खंड न पडता त्यात सातत्य राहिले पाहिजे. तसेच वेळेचाही थोडा विचार झाला पाहिजे.-के. के. खराडे, प्रवासी, मुंबई

 

गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली विमानसेवा पुन्हा सुरूझाल्याने आनंद होत आहे; यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवर मोठे प्रयत्न झाले आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. विमानसेवेसाठी, प्रवाशांच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद आहे.- कमल कटारिया,संचालक, कोल्हापूर विमानतळ

पाच दिवस विमानाचे उड्डाणअखेर केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून ट्रू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात यश आले आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे पाच दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात उतरणार असून, १५ मिनिटे थांबून १ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला रवाना होणार आहे.‘इंडिगो-ट्रू जेट’ची भेटमुंबईहून दुपारी कोल्हापूर विमानतळावर उतरलेले ट्रू जेट कंपनीचे विमान उतरले. त्याचवेळी तिरूपतीहून विमानतळावर येऊन थांबलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाने हैदराबादकडे उड्डाण केली. दोन्ही विमाने एकत्र आल्याचे दृश्य मोबाईलमधून टिपण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर