शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर विमानाचे मुंबईहून कोल्हापूरकडे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:58 IST

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात : पहिल्या विमानातून ६३ प्रवासी आले महापुरामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळला

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.

महापुराच्या छायेमुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळून ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन केले व केक कापण्यात आला. रखडलेली विमानसेवा सुुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा सुरू केली होती; परंतु कंपनीअंतर्गत अडचणींमुळे ती बंद पडली. त्यानंतर आजतागायत विमानसेवा सुरू झाली नव्हती. तिला रविवारी मुहूर्त मिळाला. दुपारी दीडच्या सुमारास ट्रू जेट कंपनीचे विमान येणार असल्याने मुंबईकडे जाणारे प्रवासी व मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्रमंडळी व प्राधिकरणाचे कर्मचारी यांमुळे हा परिसर फुलून गेला होता.

दुपारी २ वाजून २० मिनिटांंनी मुंबईहून ७२ आसनी विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे अग्निशमन दलाच्या बंबातून वॉटर शॉवर करीत या विमानाचे स्वागत करण्यात आले. विमानातून उतरलेल्या प्रवाशांचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

जिल्ह्यावर महापुराचे सावट असल्याने कोणताही झगमगाट किंवा मोठा सोहळा प्राधिकरणाच्या वतीने टाळण्यात आला. विमानतळावर छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केक कापण्यात आला. काही वेळातच हे विमान ४३ प्रवाशांना घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आपल्याला मनस्वी आनंद आहे. ही सेवा अशीच सुरूराहावी. मुंबईहून कोल्हापूरपर्यंतचा विमानप्रवास हा सुखकर व आनंददायी राहिला.- डॉ. डी. वाय. पाटील,माजी राज्यपाल

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरूझाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. या विमानसेवेत आता कोणताही खंड न पडता त्यात सातत्य राहिले पाहिजे. तसेच वेळेचाही थोडा विचार झाला पाहिजे.-के. के. खराडे, प्रवासी, मुंबई

 

गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली विमानसेवा पुन्हा सुरूझाल्याने आनंद होत आहे; यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवर मोठे प्रयत्न झाले आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. विमानसेवेसाठी, प्रवाशांच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद आहे.- कमल कटारिया,संचालक, कोल्हापूर विमानतळ

पाच दिवस विमानाचे उड्डाणअखेर केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून ट्रू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात यश आले आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे पाच दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात उतरणार असून, १५ मिनिटे थांबून १ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला रवाना होणार आहे.‘इंडिगो-ट्रू जेट’ची भेटमुंबईहून दुपारी कोल्हापूर विमानतळावर उतरलेले ट्रू जेट कंपनीचे विमान उतरले. त्याचवेळी तिरूपतीहून विमानतळावर येऊन थांबलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाने हैदराबादकडे उड्डाण केली. दोन्ही विमाने एकत्र आल्याचे दृश्य मोबाईलमधून टिपण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर