शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Kolhapur: विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे गावकरी मिठालाही महाग, मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:25 IST

कोल्हापूर : विशाळ गडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर ...

कोल्हापूर : विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर सुरू असलेली विशाळगडावरची अर्थव्यवस्था थांबली असून, गावकरी मिठालाही महाग झाले आहेत, त्यामुळे विशाळगडावरची स्थिती पूर्ववत करा, असे आर्जवच येथील ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. एका सजग नागरिकाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विशाळगडप्रकरणी आता सरकारने भूमिका घेण्याची मागणी होऊ लागली आहे.पत्रात म्हंटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आमच्या गावचे पर्यटन पूर्णपणे बंद आहे. दि. १४ जुलै रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर गावात सामान्य रहिवाशांचे जीवन दयनीय झाले आहे. आमचे इतिहासकालीन गाव, आमच्या अनेक पिढ्या येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. आमचे गाव हिंदू-मुस्लीम एकोप्याचे प्रतीक आहे. आम्ही शिवजयंती, ऊरुस, गणेशचतुर्थी, मोहरम, रामनवमी एकत्र साजरे करतो. आम्ही मिळून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. विशाळगड हे गाव प्रमुख महसूल ठिकाण असून, येथे बाहेरील राज्यातूनही पर्यटक येतात. मात्र, पर्यटकांना बंदी घातल्याने गावकरी मिठालाही महागले आहेत. गॅस सिलिंडर, अन्नधान्य, विजेचे बिल यांसारख्या मूलभूत गरजा भागविणेही कठीण झाले आहे. कित्येक घरे अंधाराखाली गेली आहेत. अनेक पोटांना उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शाळा, कॉलेजचे शुल्क भरता न आल्याने मुलांना शाळेत पाठवणे अवघड झाले आहे. बंद अर्थव्यवस्था येथील आठ वाडींसाठी हानीकारक आहे. आमच्या मुलांचे भविष्य टांगणीला आहे. आमचा गुन्हा काय?, आमच्यावर अत्याचार का ?. आम्ही कचरा व्यवस्था व अतिक्रमणाबाबत सहकार्य करण्यास तयार आहे, पण विशाळगडाची स्थिती पूर्ववत करा, अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनChief Ministerमुख्यमंत्रीFortगड