शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे गावकरी मिठालाही महाग, मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:25 IST

कोल्हापूर : विशाळ गडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर ...

कोल्हापूर : विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर सुरू असलेली विशाळगडावरची अर्थव्यवस्था थांबली असून, गावकरी मिठालाही महाग झाले आहेत, त्यामुळे विशाळगडावरची स्थिती पूर्ववत करा, असे आर्जवच येथील ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. एका सजग नागरिकाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विशाळगडप्रकरणी आता सरकारने भूमिका घेण्याची मागणी होऊ लागली आहे.पत्रात म्हंटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आमच्या गावचे पर्यटन पूर्णपणे बंद आहे. दि. १४ जुलै रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर गावात सामान्य रहिवाशांचे जीवन दयनीय झाले आहे. आमचे इतिहासकालीन गाव, आमच्या अनेक पिढ्या येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. आमचे गाव हिंदू-मुस्लीम एकोप्याचे प्रतीक आहे. आम्ही शिवजयंती, ऊरुस, गणेशचतुर्थी, मोहरम, रामनवमी एकत्र साजरे करतो. आम्ही मिळून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. विशाळगड हे गाव प्रमुख महसूल ठिकाण असून, येथे बाहेरील राज्यातूनही पर्यटक येतात. मात्र, पर्यटकांना बंदी घातल्याने गावकरी मिठालाही महागले आहेत. गॅस सिलिंडर, अन्नधान्य, विजेचे बिल यांसारख्या मूलभूत गरजा भागविणेही कठीण झाले आहे. कित्येक घरे अंधाराखाली गेली आहेत. अनेक पोटांना उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शाळा, कॉलेजचे शुल्क भरता न आल्याने मुलांना शाळेत पाठवणे अवघड झाले आहे. बंद अर्थव्यवस्था येथील आठ वाडींसाठी हानीकारक आहे. आमच्या मुलांचे भविष्य टांगणीला आहे. आमचा गुन्हा काय?, आमच्यावर अत्याचार का ?. आम्ही कचरा व्यवस्था व अतिक्रमणाबाबत सहकार्य करण्यास तयार आहे, पण विशाळगडाची स्थिती पूर्ववत करा, अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनChief Ministerमुख्यमंत्रीFortगड