शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर शक्तिपीठ महामार्गास गती, सत्ताधाऱ्यांकडून सावध पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:49 IST

बाधित शेतकऱ्यांच्या विरोधाचा फटका बसू नये म्हणून काळजी

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणी आणि भूसंपादनास शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन दोन आठवडे होऊन गेले तरी अजून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात व्यापकपणे प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झालेली नाही. बाधित शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असल्याने त्याचा राजकीय फटका बसू नये म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतर या महामार्गाला शक्ती देण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले आहे. सोलापूर जिल्ह्यात संयुक्त मोजणीसाठी विरोध होत असल्याने जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी हालचाली थंडच आहेत.

वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत ८०२ किलोमीटरचा शक्तिपीठ नियोजित आहे. यासाठी २८ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाच्या भूसंपादनास प्रशासकीय मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात प्रकल्पासाठी १२ हजार कोटी, संभाव्य व्याज ८ हजार ७८७ कोटी असे एकूण २० हजार ७८७ कोटींच्या निधीस मान्यता दिली आहे. दरम्यान, तूर्त यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यांतून जाणाऱ्या महामार्गास पर्याय तपासण्याचे आदेश दिले आहेत.मात्र कोल्हापूर जिल्ह्यात पर्याय तपासणीसाठी अजून सत्ताधारी नेत्यांकडून हालचाली दिसत नाहीत.सोलापूर जिल्हावगळता इतर जिल्ह्यांतूनही महामार्गाच्या जमीन संपादनाची प्रक्रिया गतिमान झालेली नाही. या महामार्गास बाधित शेतकऱ्यांकडून विरोध झाल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीस राजकीय फटका बसल्याचे समोर आले. आता पुन्हा तोंडावर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत ग्रामीण मतदार मोठ्या संख्येने आहेत. म्हणून बाधित शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बळाचा वापर करून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादित केली तर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राजकीय फटका बसू शकतो, असा एक मतप्रवाह सत्ताधारी नेत्यांमधून आहे. यामुळेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जमीन संपादनासंबंधी आदेश होऊनही राज्यात अजून अपेक्षित गती मिळाले नसल्याचे चित्र दिसत आहे.

तीव्र विरोध करण्याचा निर्धारशक्तिपीठ महामार्गविरोधी समितीचे राज्यातील पदाधिकारी आणि समन्वयकांची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीत महामार्गाच्या जमीन संपादनास तीव्र विरोध करणे, बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.

शक्तिपीठ महामार्गास सांगलीपर्यंत फारसा विरोध नाही. कोल्हापूर जिल्ह्यातही काही गावातच विरोध आहे. सरकार शक्तिपीठ करणारच आहे. मात्र तोंडावर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका असल्याने महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती अजून नाही. - दौलत जाधव, जिल्हा अध्यक्ष, शक्तिपीठ समर्थन समिती 

शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादनास राज्यातील बाधित शेतकऱ्यांचा विरोध आहे. या शेतकऱ्यांनी महायुतीस लोकसभेला धडा शिकवला आहे. तरीही सरकार गरज नसलेला महामार्ग रेटत आहे. आता पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत बाधित शेतकरी महायुतीस धडा शकवतील. - गिरीश फोंडे, राज्य समन्वयक, शक्तिपीठ महामार्ग विरोधी समिती