विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर ‘रणजितसिंहांचे हात वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:43+5:302021-03-30T04:14:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर मागणी व संमती नसतानाही ‘गोकुळ’चे संचालक ...

विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर ‘रणजितसिंहांचे हात वर
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : मुरगूड (ता. कागल) येथील विठ्ठल-रखुमाई पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर मागणी व संमती नसतानाही ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील यांनी आमचा संचालक मंडळात समावेश केल्याचा आरोप संचालक रघुनाथ बोंगार्डे, जगन्नाथ पुजारी, मारुती ठाणेकर, बाळकृष्ण लोकरे, एकनाथ पाटील, रणजित सासणे यांनी पत्रकातून केला.
संस्था स्थापनेपासूनच रणजितसिंह पाटील यांनी पै- पाहुणे व आप्तेष्टांनाच कोट्यवधींचे कर्ज वाटप केले. हा सगळा कारभार त्यांनी एकाधिकारशाहीनेच केला आहे. व्यवहारातील अनियमित बाबींमुळे ही संस्था सन २००६ साली बंद पडली. त्यानंतर ठेवीदार व सरकारी देण्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी मूळ संचालक मंडळाची नावे बाजूला ठेवून, सध्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाची नावे देण्यात आली. ही प्रक्रिया बोगसपणे राबवली. विशेष म्हणजे सगळे करून २८ ऑगस्ट २००६ पासून आपण संचालक नसल्याचे रणजितसिंह पाटील यांनी सहकार खात्याला लेखी देऊन हात वर केले. मात्र, २०१७ च्या ‘बिद्री’ कारखाना निवडणुकीत आपल्या नावाचा ठराव केला. त्यांनी एकाधिकारशाहीने वाटप केलेली कर्जे व सरकारची रक्कमही स्वत: भरावी, आमच्याकडे वसुलीचा तगादा लागल्यास आंदोलन उभे करू, असा इशारा या संचालकांनी दिला आहे.
धक्क्याने संचालिकेचा मृत्यू
संस्थेच्या थकबाकी व सरकारी देय रकमेच्या धक्क्याने तीन महिन्यांपूर्वी श्रीमती गुणवंती महादेव भारमल (मुरगूड) या संचालिकेचा मृत्यू झाल्याचे आराेप संचालकांनी केला.
पॅकेज वाटपामध्येही अनियमितता......
ठेवीदारांनी लोक न्यायालयातही दाद मागितल्यानंतर ठेवी परत करण्यासाठी संचालक मंडळाला अंधारात ठेवून चार कोटींचे पॅकेजही मिळविले. ठेवीदार नसणाऱ्यांनाही पॅकेजमधून धनादेश वाटप केल्याचा आरोप संचालकांनी केला.