शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोल्हापुरात शिक्षकांचे ‘जेल भरो’ प्रलंबित मागण्या मान्य करा : ...अन्यथा बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:36 IST

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन केले.

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन केले. या शिक्षकांनी महाविद्यालये बंद ठेवली. मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने दोन दिवसांत सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी आंदोलन केले. हे सर्व शिक्षक सकाळी अकरा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जमले. या ठिकाणी ‘शिक्षणमंत्र्यांचा धिक्कार असो,’ ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत,’ ‘प्रलंबित मागण्यांची पूर्तता झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. व्ही. जाधव, सचिव अविनाश तळेकर, शिक्षक नेते दादा लाड यांची भाषणे झाली. यानंतर आंदोलनातील शिक्षकांनी ‘जेल भरो’ आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले.

सांगलीत शनिवारी धरणे आंदोलनसांगली : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह राज्यातील सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.सांगलीत दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रलंबित मागण्या अशानोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.संचमान्यतेतील त्रुटी दूर करून मान्यता द्या.अर्धवेळ शिक्षकांना सेवासंरक्षण द्या.दि. २ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदावर विद्यार्थिहितासाठी नियुक्त शिक्षकांच्या मान्यता, नियुक्ती दिनांकापासून वेतन मिळावे.सन २०११-१२ पासून प्रस्तावित झालेल्या पदांना मंजुरी तत्काळ मिळाली पाहिजे.कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करावे. 

प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी महासंघाच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबरपासून आंदोलन पुकारले आहे. याचा चौथा टप्पा म्हणून आम्ही ‘जेल भरो’ केले. येत्या दोन दिवसांत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करावी; अन्यथा महासंघाच्या आदेशानुसार बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत.- अविनाश तळेकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर