शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:24 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले ...

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने, तर काही ठिकाणी समूह अध्यापन स्वरूपात भरत आहेत. त्यामुळे अंक आणि अक्षर ओळख अनेक विद्यार्थ्यांना झालेली नाही. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्याकरिता इयत्ता तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे. चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये शिकविली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३७१५

शासकीय शाळा : २१२०

खासगी शाळा : १५९५

पुन्हा नव्याने सुरुवात

- शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानात विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांना अंक आणि अक्षर ओळखण्याबाबत आवश्यक शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे.-शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे आम्ही शिक्षक स्वागत करीत असल्याचे वसंतराव चौगुले विद्यालयातील शिक्षक संतोष आयरे यांनी सांगितले.

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये

इयत्ता तिसरीबरोबरच चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकार, भाषेतील वाचन-लेखन, जोडशब्द, आदी मूलभूत कौशल्याचे धडे शाळांतून दिले जाणार असल्याचे नेहरूनगर विद्यालयातील शिक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक परेशान

कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. माझा मुलगा गेल्या वर्षी पहिलीमध्ये होता. मात्र, त्याला अ, ब, क, ड येईना म्हणून यावर्षी त्याला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसविले आहे. -उमा पाटील, शिये 

माझी मुलगी इयत्ता दुसरीत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे तिच्या शिक्षणावर निश्चितपणे परिणाम झाला आहे. तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, अक्षर ओळख, आदींबाबतचे शिक्षण देण्याचा निर्णय चांगला आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी शाळांनी घ्यावी. -दीपक मुधोळकर, गोकुळ शिरगाव 

विद्यार्थी म्हणतात 

ऑनलाइन वर्गात मला काही समजत नव्हते. मात्र, माझ्या शाळेने कमी विद्यार्थ्यांचे गट करून शिकविण्यास सुरुवात केल्याने चांगले समजू लागले. वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू व्हावेत. -अनुप्रिया वळवी, इयत्ता तिसरी 

कोरोनामुळे प्रत्यक्षात वर्गात जाता येत नाही. ऑनलाइन तासामध्ये जे काही समजत नव्हते ते मी आईकडून समजून घेत होतो. त्यामुळे माझा अभ्यास सोपा झाला. -शिवसमर्थ सागावकर, इयत्ता दुसरी

कोरोनामुळे राज्य शासनाने अद्याप ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी, तर शहरात सातवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरविण्यास परवानगी दिली नाही. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन, समूह अध्यापन पद्धतीद्वारे शिक्षण दिले जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. -एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या