शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:24 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले ...

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने, तर काही ठिकाणी समूह अध्यापन स्वरूपात भरत आहेत. त्यामुळे अंक आणि अक्षर ओळख अनेक विद्यार्थ्यांना झालेली नाही. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्याकरिता इयत्ता तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे. चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये शिकविली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३७१५

शासकीय शाळा : २१२०

खासगी शाळा : १५९५

पुन्हा नव्याने सुरुवात

- शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानात विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांना अंक आणि अक्षर ओळखण्याबाबत आवश्यक शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे.-शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे आम्ही शिक्षक स्वागत करीत असल्याचे वसंतराव चौगुले विद्यालयातील शिक्षक संतोष आयरे यांनी सांगितले.

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये

इयत्ता तिसरीबरोबरच चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकार, भाषेतील वाचन-लेखन, जोडशब्द, आदी मूलभूत कौशल्याचे धडे शाळांतून दिले जाणार असल्याचे नेहरूनगर विद्यालयातील शिक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक परेशान

कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. माझा मुलगा गेल्या वर्षी पहिलीमध्ये होता. मात्र, त्याला अ, ब, क, ड येईना म्हणून यावर्षी त्याला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसविले आहे. -उमा पाटील, शिये 

माझी मुलगी इयत्ता दुसरीत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे तिच्या शिक्षणावर निश्चितपणे परिणाम झाला आहे. तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, अक्षर ओळख, आदींबाबतचे शिक्षण देण्याचा निर्णय चांगला आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी शाळांनी घ्यावी. -दीपक मुधोळकर, गोकुळ शिरगाव 

विद्यार्थी म्हणतात 

ऑनलाइन वर्गात मला काही समजत नव्हते. मात्र, माझ्या शाळेने कमी विद्यार्थ्यांचे गट करून शिकविण्यास सुरुवात केल्याने चांगले समजू लागले. वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू व्हावेत. -अनुप्रिया वळवी, इयत्ता तिसरी 

कोरोनामुळे प्रत्यक्षात वर्गात जाता येत नाही. ऑनलाइन तासामध्ये जे काही समजत नव्हते ते मी आईकडून समजून घेत होतो. त्यामुळे माझा अभ्यास सोपा झाला. -शिवसमर्थ सागावकर, इयत्ता दुसरी

कोरोनामुळे राज्य शासनाने अद्याप ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी, तर शहरात सातवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरविण्यास परवानगी दिली नाही. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन, समूह अध्यापन पद्धतीद्वारे शिक्षण दिले जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. -एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या