शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:24 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले ...

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने, तर काही ठिकाणी समूह अध्यापन स्वरूपात भरत आहेत. त्यामुळे अंक आणि अक्षर ओळख अनेक विद्यार्थ्यांना झालेली नाही. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्याकरिता इयत्ता तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे. चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये शिकविली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३७१५

शासकीय शाळा : २१२०

खासगी शाळा : १५९५

पुन्हा नव्याने सुरुवात

- शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानात विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांना अंक आणि अक्षर ओळखण्याबाबत आवश्यक शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे.-शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे आम्ही शिक्षक स्वागत करीत असल्याचे वसंतराव चौगुले विद्यालयातील शिक्षक संतोष आयरे यांनी सांगितले.

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये

इयत्ता तिसरीबरोबरच चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकार, भाषेतील वाचन-लेखन, जोडशब्द, आदी मूलभूत कौशल्याचे धडे शाळांतून दिले जाणार असल्याचे नेहरूनगर विद्यालयातील शिक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक परेशान

कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. माझा मुलगा गेल्या वर्षी पहिलीमध्ये होता. मात्र, त्याला अ, ब, क, ड येईना म्हणून यावर्षी त्याला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसविले आहे. -उमा पाटील, शिये 

माझी मुलगी इयत्ता दुसरीत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे तिच्या शिक्षणावर निश्चितपणे परिणाम झाला आहे. तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, अक्षर ओळख, आदींबाबतचे शिक्षण देण्याचा निर्णय चांगला आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी शाळांनी घ्यावी. -दीपक मुधोळकर, गोकुळ शिरगाव 

विद्यार्थी म्हणतात 

ऑनलाइन वर्गात मला काही समजत नव्हते. मात्र, माझ्या शाळेने कमी विद्यार्थ्यांचे गट करून शिकविण्यास सुरुवात केल्याने चांगले समजू लागले. वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू व्हावेत. -अनुप्रिया वळवी, इयत्ता तिसरी 

कोरोनामुळे प्रत्यक्षात वर्गात जाता येत नाही. ऑनलाइन तासामध्ये जे काही समजत नव्हते ते मी आईकडून समजून घेत होतो. त्यामुळे माझा अभ्यास सोपा झाला. -शिवसमर्थ सागावकर, इयत्ता दुसरी

कोरोनामुळे राज्य शासनाने अद्याप ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी, तर शहरात सातवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरविण्यास परवानगी दिली नाही. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन, समूह अध्यापन पद्धतीद्वारे शिक्षण दिले जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. -एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या