शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कोल्हापूरात अवैध प्रवासी वाहतुकीवर आजपासून कारवाई

By admin | Updated: April 6, 2017 17:50 IST

महानगरपालिकेचे आश्वासन : चार पथके तयार, रिक्षा करणार जप्त

आॅनलाईन लोकमत  

कोल्हापूर, दि. ६ शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळ घालण्यासाठी चार फिरती पथके तयार करण्यात आली असून आज, शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होईल, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी.टी.पवार यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाला दिले. अवैध वाहतुक करणारी वाहने जप्त करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जर येत्या पंधरा दिवसात अवैध प्रवासी वाहतुक रोखली नाही, तर मात्र आम्ही स्वत: रस्त्यांवर उतरुन कारवाई करु, असा इशारा महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी दिला. कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यापासून अवैध प्रवासी वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच शहर हद्दीत परवाना नसतानाही सहा आसनी रिक्षा वाहतुक सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी आणि केएमटी वाचवावी अशी मागणी करण्यासाठी महानगरपालिकेचे उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, नगरसेवक तौफीक मुल्लाणी,विजय खाडे, अभिजित चव्हाण, अशोक जाधव, प्रताप जाधव, सूरजंजिरी लाटकर, उमा बनसोडे, शोभा कवाळे, माधूरी लाड, प्रभारी अतिरीक्त वाहतुक व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डी. टी. पवार यांची भेट घेतली.

यावेळी स्वाभिमानी रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. तीन केएमटी बसमधून हे सर्व जण प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पोहचले. ‘हटाव हटाव - वडाप हटाव’, ‘वडाप हटाव, केएमटी बचाव’ अशा घोषणा देतच सर्वजण डी. टी. पवार यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी पवार हे त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत बसले होते.

परिवहन सभापती खान, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, अशोक जाधव, सूमंजिरी लाटकर यांनी शिष्टमंडळ घेऊन येण्याचे कारण सांगितले. शहरात अवैध रिक्षा वाहतुक सुरु असल्याने केएमटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. हजारो बेकायदेशीर रिक्षा शहरात फिरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

अडचणी येऊ नयेत : पवार

कारवाई करताना काय अडचणी येतात याचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे कारवाई सुरु झाली की पुन्हा अशा अडचणी येऊ नयेत अशी अपेक्षा डी. टी.पवार यांनी व्यक्त केली. आम्ही अशा वडाप रिक्षा वाहतुकीला आळा घालण्याकरीता चार पथके तयार केली असून  शुक्रवारपासून ही कारवाई सुरु होईल. एक पथक कायमस्वरुपी तैनात केले जाईल. सहा आसनी रिक्षा तसेच आयुष्य संपलेल्या रिक्षा जप्त केल्या जातील, तसेच प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

फोनवर दम देतात ...

प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करताना ‘आम्ही कारवाई सुरु केली की लगेच फोनवर दम दिला जातो. कारवाईत व्यत्यय आणला जातो. असा अनुभव येणार नाही याची दक्षता आपण सर्वजणांनी घ्यावी’, अशी विनंती केली. आम्ही अवैध प्रवासी वाहतुकीला कधीही पाठीशी घातले नाही, पण फोनवर दम दिल्याने त्यात खंड पडतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्याचवेळी त्यांना रोखत शारंगधर देशमुख यांनी त्यांना अशा कारवाईत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, उलट आम्ही तुमच्या सोबतच राहू, असे सांगितले. पंधरा दिवसांची मुदत शहरातील वडाप वाहतुक बंद करण्यासाठी नगरसेवकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. जर या पंधरा दिवसात वडाप पूर्णपणे बंद झाले नाही तर मात्र आम्ही सर्व नगररसेवक, केएमटीचे कर्मचारी रस्त्यावर उतरुन स्वत: कारवाई करणार असा इशारा यावेळी देण्यात आला.