शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

स्टार ८४९ जिल्ह्यातील सात बोगस डॉक्टरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोना काळात जिल्ह्यातील सात बोगस डॉक्टरांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अजूनही ही प्रक्रिया संपली नसून महाराष्ट्र ...

कोल्हापूर : कोरोना काळात जिल्ह्यातील सात बोगस डॉक्टरांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अजूनही ही प्रक्रिया संपली नसून महाराष्ट्र कौन्सिलकडून त्यांच्याकडे नोंदणी नसल्याचे सिद्ध झाल्यावर या डॉक्टरांच्या बोगसपणावर शिक्कामोर्तब होणार आहे.

जिल्ह्यातील बोगस डॉक्टर्सवर कारवाई करण्यासाठी तीन समित्या कार्यरत आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नंतरची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत अशा या तीन समित्या आहेत. १ मार्च २०२१ पासून या सात जणांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील सहा ग्रामीण भागातील तर एक महापालिका क्षेत्रातील आहे.

तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याआधी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जातो. पदवीबाबत अखेरची खात्री करण्यासाठी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस विभागांच्या परिषदांकडे अहवाल मागवला जातो.

१) जिल्ह्यात एकूण बोगस डॉक्टर्सवर कारवाई - ७

२) तालुकानिहाय बोगस डॉक्टर्स

अ - हातकणंगले ४

ब -पन्हाळा १

क - करवीर १

ड -कोल्हापूर महापालिका १

३) सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ

चौकट

कोरोना काळातही घरात राहण्याचा सल्ला

मार्चनंतर कोरोना काळातही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला घरातच बरे करतो, अशी खात्री यातील एका डॉक्टराने दिली होती. मात्र या पद्धतीने रुग्ण घरातच ठेवल्यानंतर तब्येत अधिक बिघडल्याने अखेर शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. याचा मोठा मनस्ताप कुटुंबीयांना सहन करावा लागला.

चौकट

कोरोना काळातील भीतीचा फायदा घेत एका डॉक्टरने गावातच उपचार करण्याच्या नावाखाली केवळ सलाईन लावल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

चौकट

यातील काही डॉक्टरांकडे पल्स ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन यासारखी अगदी प्राथमिक आणि आवश्यक असणारी उपकरणे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

चौकट

तक्रार आल्यानंतरच कारवाई

बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना शक्यतो तक्रार आली किंवा काही दुर्घटना घडली तरच चौकशी सुरू केली जाते. त्याला कारणही तसेच आहे. शासकीय यंत्रणा अजूनही म्हणावी तशी वाड्यावस्त्यांवर, खेडोपाडी पोहोचलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी आधार म्हणून यातील अनेक डॉक्टर कार्यरत असतात. ते बोगस आहेत की नाहीत याच्याशी ग्रामस्थांना देणे घेणे नसते. तर ते वेळेला उपयोगी पडत असल्याने शक्यतो तक्रारी होत नाहीत. काही दुर्घटना घडली तर मग चौकशी होते. विनातक्रार अपवादात्मक स्थितीत कारवाई केली जाते.