शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:16 IST

सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा

कोल्हापूर : उचगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निकालावरून खासदार धनंजय महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे गट आमने-सामने आले आहेत. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी महाडीक गटाने केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजकीय वाद नवीन नाही. यापूर्वी पाचगावचा सत्तासंघर्ष उफाळून आला होता. परंतु यावेळची पाचगावची निवडणूक शांततेत झाली. मात्र आता उचगाववरून वाद उफाळला आहे. उचगावमध्ये थेट सरपंचपदासाठी काँग्रेसचे मधुकर चव्हाण व भाजपचे सतीश मर्दाने यांच्यात लढत झाली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करण्यापूर्वीच मर्दाने समर्थकांनी जल्लोष केला.

संपूर्ण मतमोजणीनंतर चव्हाण यांना ६९ मतांनी विजयी घोषित केले. त्यावर, मर्दाने समर्थकांनी हरकत घेतली. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी मोर्चा काढत जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात निवेदन दिले. आता यावरून खासदार महाडीक व आमदार पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

..म्हणून आम्ही मोर्चे काढले नाहीत : सतेज पाटीलराजकारणात जय-पराजय होत असतो, आम्ही लोकशाही मानणारे आहोत. गांधीनगर, कंदलगावसह तीन गावांत आमचा सरपंच झाला नाही म्हणून आम्ही तिथे मोर्चे काढले नाहीत, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला.लोकशाहीत परत निवडणुका घ्यायची पद्धत असती तर आम्ही २०१४ ची निवडणूक घ्या म्हटले असते. ईव्हीएममध्ये मतदानाची नोंद होत असते. मतमोजणीवेळी पोलिंग एजंट असतात. संशय घेण्यापेक्षा निकाल मान्य केला पाहिजे, लोकशाहीत हे चालत असतं. पराभव पचविण्याची ताकद पाहिजे.

अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये : धनंजय महाडिकविधानसभा २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचविण्याचे शिकवू नये, असा पलटवार खासदार धनंजय महाडिक यांनी केला.आम्ही आतापर्यंत अनेक पराभव पचवून शिखरावर पोहोचलो आहोत. उचगावमध्ये मतदान झाल्यानंतर सतेज पाटील यांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या.अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोपदेखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

त्यामुळे उचगावातील ग्रामस्थांचे केवळ एकच म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी करावी. आपण ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा केला जाईल, असे खासदार महाडीक यांनी म्हटले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक