शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

महापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, शिवसेना नेत्यांची मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 10:56 IST

Uday Samant- गद्दारी करणाऱ्यांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. अशा गद्दारांचा एकदा शोध घ्याच आणि त्यांना कडक शिक्ष करा. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, उदय सामंत यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना नेत्यांची मते शिवसेनेची पहिली बैठक, गटतट विसरून सर्वजण उपस्थित

कोल्हापूर : गद्दारी करणाऱ्यांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. अशा गद्दारांचा एकदा शोध घ्याच आणि त्यांना कडक शिक्ष करा. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.कोल्हापूर शहर शिवसेनेमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाद असल्याचे जगजाहीर आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बैठक घेतली. या बैठकीवेळी ते एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षातील गद्दरांचा विषय चर्चेत आहे. यामुळेच हा विषय या बैठकीत उपस्थित झाला असण्याची शक्यता आहे.एकदिलाने काम करून जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्यात, असे आवाहन संपर्कमंत्री सामंत यांनी केले. यावेळी गट-तट बाजूला ठेवून निवडणूक लढल्यास शिवसेनेच्या २५ पेक्षा जास्त जागा निश्चित येतील, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती.बैठकीनंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पोषक वातावरण असून, भाजपला निवडणुकीत दूर ठेवण्याची सूचना केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने एकत्र निवडणूक लढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतील. शिवसेनेतील गटबाजीमुळे आतापर्यंत पक्षाला तोटाच झाला आहे. आता मात्र महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शहरातील गटबाजी संपवा, अशा सूचना शिवसेनेतील नेत्यांना केल्या. तसेच ८१ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करण्याचे सांगितले आहे.मतभेद आहेत, मनभेद नाहीतशहर शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसत असल्याबाबत विचारले असता मंत्री उदय सामंत म्हणाले, शहर शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत, मनभेद आहेत. ही पक्ष जिवंत असण्याची लक्षणे आहेत. संपर्कप्रमुख दुधवडकर आणि शिवसेनेचे दोन्ही खासदार हा वाद मिटवतील आणि आम्ही महापालिकेची निवडणूक एकसंध राहून लढू.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर