शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रंगकर्मींच्या तालमींना वेग, ‘राज्य नाट्य’चे बिगुल : शुक्रवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:02 IST

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५९ व्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी संस्थांकडून तालमींना वेग आला आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस राहिल्याने रंगकर्मी दिवसभरातील आपले काम, व्यवसायाचा व्याप सांभाळून रात्री उशिरापर्यंत तालमींवर जोर देत आहेत. दुसरीकडे, पडद्यामागे काम करणारे नेपथ्यकार, रंग-वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देरंगकर्मींच्या तालमींना वेग‘राज्य नाट्य’चे बिगुल : शुक्रवारपासून प्रारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५९ व्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी संस्थांकडून तालमींना वेग आला आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस राहिल्याने रंगकर्मी दिवसभरातील आपले काम, व्यवसायाचा व्याप सांभाळून रात्री उशिरापर्यंत तालमींवर जोर देत आहेत. दुसरीकडे, पडद्यामागे काम करणारे नेपथ्यकार, रंग-वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू आहे.नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ आणि नव्या पिढीतील कलावंत घडविणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेला एक परंपरा लाभली आहेच; शिवाय या स्पर्धेत सहभागी होणे हे हौशी कलावंतांचे स्वप्न असते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे यंदा ५९वी राज्य नाट्य स्पर्धेची कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५)पासून सुरू होत आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत यंदा २९ नाटके सादर होणार आहेत. यात कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव येथूनही संघ सहभागी होणार आहेत.दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेची तारीख दिवाळीनंतर जाहीर होत असली तरी कलावंतांकडून स्क्रिप्टची निवड, कलाकारांची निवड ही प्राथमिक तयारी तीन महिने आधीपासूनच सुरू असते. गणेशोत्सवानंतर जाहीर होणाºया स्पर्धेच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागून राहते.

स्पर्धा जाहीर झाल्यावर प्रत्यक्ष तालमींना रंग येतो. सध्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांच्या तालमी रंगू लागल्या आहेत. या स्पर्धेत भाग घेणारे, अभिनयापासून ते इतर तांत्रिक सहकार्य करणारे रंगकर्मी हौशी असतात.

आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून ते या स्पर्धेसाठी आणि तालमींसाठी वेळ देतात. त्यामुळे सायंकाळी सातनंतर सगळे एकत्र जमतात आणि तालीम सुरू होते. त्यासाठी सांस्कृतिक कार्यालये, शाळांचे हॉल, संस्थांचे हॉल, तरुण मंडळांचे हॉल घेण्यात आले आहे. स्पर्धेला आता अवघे तीन दिवस राहिल्याने सध्याच्या तालमीत नेपथ्यासाठी वापरल्या जाणाºया साहित्याचाही समावेश झाला आहे.

आम्ही हलकंफुलकं कौटुंबिक जिव्हाळ्यावर आधारित कौटुंबिक नाटक स्पर्धेत सादर करीत आहोत. संस्थेतील सगळेच कलाकार हौशी आणि तरुण आहेत; त्यामुळे दिवसभर महाविद्यालय, नोकरी, व्यवसाय सांभाळून रात्री नाटकासाठी वेळ दिला जातो. भूमिकेतील कलावंत, नेपथ्य, पार्श्वसगीत, रंगभूषा अशी प्रत्येक जबाबदारी सगळे मिळून पार पाडत आहोत. रात्री आठ ते अकरा वेळेत तालीम चालते.- शेखर बारटक्के (दिग्दर्शक)श्री लक्ष्मी वसाहत विकास तरुण मंडळ

 

 

टॅग्स :Natakनाटकcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर