शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:15 IST

बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

कोल्हापूर : जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण रफूचक्कर झाल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. त्यातील सुमारे १४४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरण असो अगर फूस लावून पळवलेल्या असो, त्याची पोलिसांत नोंद करणे आवश्यकच असते; पण अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्यास त्याबाबत ज्या तरुणासोबत गेल्या त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो. बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

बहुतांश प्रकरणात मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस दप्तरी नोंद मात्र अपहरणाची होते, त्यामुळे अपहरणाचा आकडा हा मोठा दिसतो. प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थिती वेगळीच असते. सज्ञान विवाह करून परतल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन ते प्रकरण निकाली काढण्यासाठी पोलिसांनाच त्या जोडप्यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागतात.

तीन वर्षांत ६१५ बेपत्ता, सापडले ४९८

गेल्या वर्षभरात सुमारे १९८ मुली व मुले बेपत्ता झाल्याच्या नोंदी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाल्या आहेत. बहुतांश मुली या आपल्या प्रियकरासोबत गेल्याचे उघड झाले आहे. या बेपत्ता मुला-मुलींपैकी १४४ जण सापडल्याची नोंद दिसून येते, तर २०२० मध्ये १५० जण बेपत्ता झाले, त्यापैकी ११६ जण सापडले. तसेच २०१९ मध्ये तब्बल २६७ बेपत्तापैकी २३८ जण सापडल्याचे पोलीस दप्तरी दिसते.

लग्न न झालेले अन् झालेले देखील

वर्षभरात अनेक मुली या आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. अनेक अल्पवयीन असल्याने त्यांना विवाहाच्या अडचणी उद्भवल्याने ती जोडपी काही दिवस बाहेर राहून परतली, तर अनेकजण विवाह करूनच घरी परतत असल्याचे दिसून आले आहे.

शहरात अधिक, ग्रामीणमध्ये कमी

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता मुले, मुली पळून जाण्याच्या तक्रारींची नोंद ही शहरातील पोलीस ठाण्यात तुलनेने जादा दिसते, तर त्या प्रमाणात ग्रामीण भागात काही अंशी कमी असल्याचे दिसून येत आहे.

राग किंवा प्रेम...

- मुले व मुली पळून जाण्याची दोनच कारणे सध्या पुढे आली आहेत. घरचे रागावलेत म्हणून एकादा-दुसरा दिवस घरातून पळून जाऊन मित्र अगर मैत्रिणींच्या घरी राहतात.

- तक्रार नोंद झाल्यानंतर ते परत येत असल्याचे दिसते, तर बहुतांशी प्रकरणात प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी