शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:15 IST

बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

कोल्हापूर : जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण रफूचक्कर झाल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. त्यातील सुमारे १४४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरण असो अगर फूस लावून पळवलेल्या असो, त्याची पोलिसांत नोंद करणे आवश्यकच असते; पण अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्यास त्याबाबत ज्या तरुणासोबत गेल्या त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो. बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

बहुतांश प्रकरणात मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस दप्तरी नोंद मात्र अपहरणाची होते, त्यामुळे अपहरणाचा आकडा हा मोठा दिसतो. प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थिती वेगळीच असते. सज्ञान विवाह करून परतल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन ते प्रकरण निकाली काढण्यासाठी पोलिसांनाच त्या जोडप्यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागतात.

तीन वर्षांत ६१५ बेपत्ता, सापडले ४९८

गेल्या वर्षभरात सुमारे १९८ मुली व मुले बेपत्ता झाल्याच्या नोंदी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाल्या आहेत. बहुतांश मुली या आपल्या प्रियकरासोबत गेल्याचे उघड झाले आहे. या बेपत्ता मुला-मुलींपैकी १४४ जण सापडल्याची नोंद दिसून येते, तर २०२० मध्ये १५० जण बेपत्ता झाले, त्यापैकी ११६ जण सापडले. तसेच २०१९ मध्ये तब्बल २६७ बेपत्तापैकी २३८ जण सापडल्याचे पोलीस दप्तरी दिसते.

लग्न न झालेले अन् झालेले देखील

वर्षभरात अनेक मुली या आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. अनेक अल्पवयीन असल्याने त्यांना विवाहाच्या अडचणी उद्भवल्याने ती जोडपी काही दिवस बाहेर राहून परतली, तर अनेकजण विवाह करूनच घरी परतत असल्याचे दिसून आले आहे.

शहरात अधिक, ग्रामीणमध्ये कमी

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता मुले, मुली पळून जाण्याच्या तक्रारींची नोंद ही शहरातील पोलीस ठाण्यात तुलनेने जादा दिसते, तर त्या प्रमाणात ग्रामीण भागात काही अंशी कमी असल्याचे दिसून येत आहे.

राग किंवा प्रेम...

- मुले व मुली पळून जाण्याची दोनच कारणे सध्या पुढे आली आहेत. घरचे रागावलेत म्हणून एकादा-दुसरा दिवस घरातून पळून जाऊन मित्र अगर मैत्रिणींच्या घरी राहतात.

- तक्रार नोंद झाल्यानंतर ते परत येत असल्याचे दिसते, तर बहुतांशी प्रकरणात प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी