शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:15 IST

बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

कोल्हापूर : जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण रफूचक्कर झाल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. त्यातील सुमारे १४४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरण असो अगर फूस लावून पळवलेल्या असो, त्याची पोलिसांत नोंद करणे आवश्यकच असते; पण अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्यास त्याबाबत ज्या तरुणासोबत गेल्या त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो. बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

बहुतांश प्रकरणात मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस दप्तरी नोंद मात्र अपहरणाची होते, त्यामुळे अपहरणाचा आकडा हा मोठा दिसतो. प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थिती वेगळीच असते. सज्ञान विवाह करून परतल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन ते प्रकरण निकाली काढण्यासाठी पोलिसांनाच त्या जोडप्यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागतात.

तीन वर्षांत ६१५ बेपत्ता, सापडले ४९८

गेल्या वर्षभरात सुमारे १९८ मुली व मुले बेपत्ता झाल्याच्या नोंदी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाल्या आहेत. बहुतांश मुली या आपल्या प्रियकरासोबत गेल्याचे उघड झाले आहे. या बेपत्ता मुला-मुलींपैकी १४४ जण सापडल्याची नोंद दिसून येते, तर २०२० मध्ये १५० जण बेपत्ता झाले, त्यापैकी ११६ जण सापडले. तसेच २०१९ मध्ये तब्बल २६७ बेपत्तापैकी २३८ जण सापडल्याचे पोलीस दप्तरी दिसते.

लग्न न झालेले अन् झालेले देखील

वर्षभरात अनेक मुली या आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. अनेक अल्पवयीन असल्याने त्यांना विवाहाच्या अडचणी उद्भवल्याने ती जोडपी काही दिवस बाहेर राहून परतली, तर अनेकजण विवाह करूनच घरी परतत असल्याचे दिसून आले आहे.

शहरात अधिक, ग्रामीणमध्ये कमी

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता मुले, मुली पळून जाण्याच्या तक्रारींची नोंद ही शहरातील पोलीस ठाण्यात तुलनेने जादा दिसते, तर त्या प्रमाणात ग्रामीण भागात काही अंशी कमी असल्याचे दिसून येत आहे.

राग किंवा प्रेम...

- मुले व मुली पळून जाण्याची दोनच कारणे सध्या पुढे आली आहेत. घरचे रागावलेत म्हणून एकादा-दुसरा दिवस घरातून पळून जाऊन मित्र अगर मैत्रिणींच्या घरी राहतात.

- तक्रार नोंद झाल्यानंतर ते परत येत असल्याचे दिसते, तर बहुतांशी प्रकरणात प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी