शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:15 IST

बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

कोल्हापूर : जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण रफूचक्कर झाल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. त्यातील सुमारे १४४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम प्रकरण असो अगर फूस लावून पळवलेल्या असो, त्याची पोलिसांत नोंद करणे आवश्यकच असते; पण अल्पवयीन मुली रफूचक्कर झाल्यास त्याबाबत ज्या तरुणासोबत गेल्या त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो. बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात.

बहुतांश प्रकरणात मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस दप्तरी नोंद मात्र अपहरणाची होते, त्यामुळे अपहरणाचा आकडा हा मोठा दिसतो. प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थिती वेगळीच असते. सज्ञान विवाह करून परतल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन ते प्रकरण निकाली काढण्यासाठी पोलिसांनाच त्या जोडप्यांच्याकडे वारंवार चकरा माराव्या लागतात.

तीन वर्षांत ६१५ बेपत्ता, सापडले ४९८

गेल्या वर्षभरात सुमारे १९८ मुली व मुले बेपत्ता झाल्याच्या नोंदी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत झाल्या आहेत. बहुतांश मुली या आपल्या प्रियकरासोबत गेल्याचे उघड झाले आहे. या बेपत्ता मुला-मुलींपैकी १४४ जण सापडल्याची नोंद दिसून येते, तर २०२० मध्ये १५० जण बेपत्ता झाले, त्यापैकी ११६ जण सापडले. तसेच २०१९ मध्ये तब्बल २६७ बेपत्तापैकी २३८ जण सापडल्याचे पोलीस दप्तरी दिसते.

लग्न न झालेले अन् झालेले देखील

वर्षभरात अनेक मुली या आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या. अनेक अल्पवयीन असल्याने त्यांना विवाहाच्या अडचणी उद्भवल्याने ती जोडपी काही दिवस बाहेर राहून परतली, तर अनेकजण विवाह करूनच घरी परतत असल्याचे दिसून आले आहे.

शहरात अधिक, ग्रामीणमध्ये कमी

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता मुले, मुली पळून जाण्याच्या तक्रारींची नोंद ही शहरातील पोलीस ठाण्यात तुलनेने जादा दिसते, तर त्या प्रमाणात ग्रामीण भागात काही अंशी कमी असल्याचे दिसून येत आहे.

राग किंवा प्रेम...

- मुले व मुली पळून जाण्याची दोनच कारणे सध्या पुढे आली आहेत. घरचे रागावलेत म्हणून एकादा-दुसरा दिवस घरातून पळून जाऊन मित्र अगर मैत्रिणींच्या घरी राहतात.

- तक्रार नोंद झाल्यानंतर ते परत येत असल्याचे दिसते, तर बहुतांशी प्रकरणात प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी