शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

‘आपले सरकार केंद्र’ महाआयटीच्या ताब्यात, कारभार सुधारण्याची अपेक्षा

By समीर देशपांडे | Updated: June 21, 2024 17:19 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : नागरिकांना गावामध्ये विविध दाखले प्राप्त व्हावेत, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’चा कारभार ...

समीर देशपांडेकोल्हापूर : नागरिकांना गावामध्ये विविध दाखले प्राप्त व्हावेत, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’चा कारभार आता महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ’ महाआयटी या कंपनीच्यावतीने चालवण्यात येणार आहे. बुधवारी याबाबत शासन आदेश निघाला आहे.पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता आणि पारदर्शकता यावी, नागरिकांना विविध दाखले तातडीने मिळावेत, यासह एकाच केंद्रावर बँकिंगसह अन्य सेवा मिळाव्यात यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची स्थापना करण्यात आली. ११ ऑगस्ट २०१६ रोजी राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये या केंद्रांची स्थापना करण्यात आली आणि सीएससी, एसपीव्ही या केंद्र शासन प्रेरित कंपनीला हे काम देण्यात आले होते. यानंतर १४ जानेवारी २०२१ या शासन निर्णयानुसार या कंपनीला मुदतवाढ देण्यात आली.

परंतु, कामकाजातील अनियमितता, सॉफ्टवेअरच्या सुविधांच्या मर्यादा, केंद्र चालकांचे सातत्याने उशिरा दिले जाणारे मानधन, सेवा आणि प्रशिक्षणाबाबत शासनाकडे वारंवार लोकप्रतिनिधी, केंद्रचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. यानंतर शासनाने तीन पत्र पाठवून या तक्रारींचे निवारण करण्याबाबत कंपनीला कळविण्यात आले होते.परंतु, याबाबत कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर १६ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय झाला. आता राज्य शासनाच्याच माहिती तंत्रज्ञान महामंडळ लि. या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये

  • कंपनीला प्रति केंद्र महिन्याला २,९५० रुपये देण्यात येतील.
  • कामाच्या प्रमाणात आणि केंद्रातील उपस्थितीनुसार केंद्र चालकांना अधिकाधिक १० हजार रुपये मानधन मिळेल.
  • दैनंदिन तक्रारींचे निराकरण कंपनीने करावयाचे असून, त्याची ग्रामविकास विभाग दखल घेणार नाही.
  • आपले सरकारवरील ४०० सेवा देणे.
  • रेल्वे, बसेस आरक्षणसह अन्य लोकोपयोगी सेवा देणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर