शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

‘आपला दवाखाना’, कोल्हापुरात कसाबसा एक सुरू; बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:14 IST

दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली.

कोल्हापूर : ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ अशा शब्दात शासकीय कामाचे उपहासात्मक वर्णन केले जाते. शासकीय योजनांच्या बाबतीतही असाच अनुभव येतो. दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली. या योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात १३ दवाखाने सुरू करायचे होते, त्यातील कसाबसा एक दवाखाना सुरू करण्यात आला. बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच राहिले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे दवाखाने सुरू करण्यास विलंब झाला आहे. लवकरच पाच दवाखाने सुरू करत आहोत. जिल्हा परिषदेकडून औषध खरेदी करण्यात येणार आहे. औषधे खरेदी होऊन आमच्याकडे आली की हे दवाखाने सुरू केले जातील. या दवाखान्याकरिता लागणारे वैद्यकीय अधिकारी, नर्स यांच्यासह आवश्यक कर्मचारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले.

१३ दवाखान्यांस मंजुरी, प्रत्यक्षात एकच सुरुकोल्हापूर शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १३ आपला दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. योजनेची घोषणा होताच सुरूवातीला पितळी गणपती मंदिराजवळील महापालिकेच्या जागेत एक दवाखाना सुरू करण्यात आला. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स तसेच अन्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी आहे.

‘लोकमत’ने केली पाहणीपितळी गणपती चौक : दुपारी तीन वाजतायाठिकाणी रोज २० ते २५ रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. कधी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिकडे जावे लागते. त्यांना अन्य जबाबदाऱ्याही दिल्या जातात. लॅब असिस्टंट दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध असतात. दवाखाना ताराबाई पार्कमध्ये असला तरी बायोमेट्रिक हजेरी देण्यासाठी रोज दोनवेळा महापालिकेत जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही मिनिटे उशीर होतो. दवाखाना बंद करतेवेळी काही मिनिटे अगोदर जावे लागते.

आपला दवाखाना येथे चांगली औषधे दिली जातात. वेगवेगळ्या चाचण्याही केल्या जातात. त्यामुळे रुग्णांचा चांगला प्रतिसाद आहे. मृत्यू दाखला देण्याची जबाबदारी असते, त्यामुळे कधी कधी बाहेर जावे लागते. बैठकांनाही जावे लागते. परंतु, रुग्ण सायंकाळी पाचनंतर येत असल्याने तशी गैरसोय होत नाही. - डॉ. सुनीता पाटील वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल