शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

‘आपला दवाखाना’, कोल्हापुरात कसाबसा एक सुरू; बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:14 IST

दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली.

कोल्हापूर : ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ अशा शब्दात शासकीय कामाचे उपहासात्मक वर्णन केले जाते. शासकीय योजनांच्या बाबतीतही असाच अनुभव येतो. दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली. या योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात १३ दवाखाने सुरू करायचे होते, त्यातील कसाबसा एक दवाखाना सुरू करण्यात आला. बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच राहिले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे दवाखाने सुरू करण्यास विलंब झाला आहे. लवकरच पाच दवाखाने सुरू करत आहोत. जिल्हा परिषदेकडून औषध खरेदी करण्यात येणार आहे. औषधे खरेदी होऊन आमच्याकडे आली की हे दवाखाने सुरू केले जातील. या दवाखान्याकरिता लागणारे वैद्यकीय अधिकारी, नर्स यांच्यासह आवश्यक कर्मचारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले.

१३ दवाखान्यांस मंजुरी, प्रत्यक्षात एकच सुरुकोल्हापूर शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १३ आपला दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. योजनेची घोषणा होताच सुरूवातीला पितळी गणपती मंदिराजवळील महापालिकेच्या जागेत एक दवाखाना सुरू करण्यात आला. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स तसेच अन्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी आहे.

‘लोकमत’ने केली पाहणीपितळी गणपती चौक : दुपारी तीन वाजतायाठिकाणी रोज २० ते २५ रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. कधी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिकडे जावे लागते. त्यांना अन्य जबाबदाऱ्याही दिल्या जातात. लॅब असिस्टंट दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध असतात. दवाखाना ताराबाई पार्कमध्ये असला तरी बायोमेट्रिक हजेरी देण्यासाठी रोज दोनवेळा महापालिकेत जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही मिनिटे उशीर होतो. दवाखाना बंद करतेवेळी काही मिनिटे अगोदर जावे लागते.

आपला दवाखाना येथे चांगली औषधे दिली जातात. वेगवेगळ्या चाचण्याही केल्या जातात. त्यामुळे रुग्णांचा चांगला प्रतिसाद आहे. मृत्यू दाखला देण्याची जबाबदारी असते, त्यामुळे कधी कधी बाहेर जावे लागते. बैठकांनाही जावे लागते. परंतु, रुग्ण सायंकाळी पाचनंतर येत असल्याने तशी गैरसोय होत नाही. - डॉ. सुनीता पाटील वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल