शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

ए. वाय. पाटील यांचा उपाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा; जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 21:28 IST

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे आणि पक्षाच्या नाट्यमय स्थितीमुळे पाटील यांचा हा राजीनामा अधिकच शंकास्पद ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोळांकूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव तथा ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. सुनील तटकरे यांना पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात, पाटील यांनी वैयक्तिक कारणे आणि पदावर वेळ देण्याच्या असमर्थतेचा उल्लेख केला आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे आणि पक्षाच्या नाट्यमय स्थितीमुळे पाटील यांचा हा राजीनामा अधिकच शंकास्पद ठरला आहे. त्यांच्या या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, यामागील खरे कारण काय असावे याबद्दल तर्कवितर्कांच्या चर्चेला उधाण आले आहे. हा राजीनामा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळेच आहे की पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील काही दडपशाहीमुळे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे पुढील नेतृत्व कोण करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  ए. वाय. पाटील यांच्या या राजीनाम्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटील यांचा राजीनामा पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा परिणाम आहे का, कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील या नाट्यमय घडामोडींचे भविष्यातील राजकीय परिणाम काय असू शकतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर