शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Kolhapur: कागलला सव्वादोन किलोमीटरचा उड्डाण पूल, वाहतूक कोंडी कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:02 IST

महामार्गाच्या चौपदरीकरणात कागल येथे अनेक त्रुटी राहिल्या होत्या

सतीश पाटील कोल्हापूर : कागल येथील शाहू साखर कारखान्याचा माळ बंगला ते कागल चेकपोस्टपर्यंत २ किलोमीटरचा २४७ मीटरचा पिलरचा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६०० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. हा उड्डाणपूल कसा असणार याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे.या २४७० मीटरपैकी १९७५ मीटरचा उड्डाण पूल ५५ मीटरच्या अंतरावर ३६ ते ४० पिलरवर उभारणार आहे. रुंदी २५ मीटर असणार आहे. कोल्हापूरच्या दिशेने २७५ मीटर आणि बंगळुरूच्या दिशेने २२० मीटर शेवटचा उतार असणार आहे. २००६ साली महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यावेळी महामार्गाच्या चौपदरीकरणात कागल येथे अनेक त्रुटी राहिल्या होत्या. महामार्गामुळे कागलचे पूर्व-पश्चिम असे विभाजन झाले असून, येथील जनतेलासुद्धा याचा त्रास होत होता. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी हा प्रश्न खूप मोठा होता. गेली २० वर्षे कागलवासीयांना आणि आसपासच्या गावांना मोठा त्रास झाला आहे. कित्येक अपघात याठिकाणी झाले. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. कित्येकजण कायमचे जायबंदी झाले. वाहतूक कोंडी तर नित्यनेमाने होत होती, म्हणूनच कागलच्या जनतेने याठिकाणी पिलरवरचा उड्डाण पूल उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती, ती पूर्णत्वास येत आहे.कणकवली आणि कराड येथे उभारलेल्या पिलरच्या उड्डाण पुलाप्रमाणे कागल येथेही तसाच उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर-बंगळूरु महामार्गावरील कागल शहर हे औद्योगिकदृष्ट्या, तसेच व्यापारीदृष्ट्या वेगाने विकसित होत आहे मात्र, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आणि रहदारीच्या अनियमिततेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. विशेषतः बस स्थानक परिसर, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर रोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते.

५५ मीटरकागल येथील चेकपोस्ट नाका ते कोर्टापर्यंत उभारला प्राणात उडाण पूल हा ३६ ते ४० पिलरवर उभारण्यात येणार आहे. या पिलरमधील अंतर सुमारे ४५ मीटर असणार आहे. या उड्डाणपुलामुळे  कोंडी कमी होऊन कागलकरांना दिलासा मिळणार आहे.कागलसह जवळच्या गावांना होणार लाभकागल शहर, कसबा सांगाव सुळकूड, मौजे सांगाव ही गावे, मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्टँड शाळा, हे पूर्व बाजूला, तर सर्व प्रशासकीय कार्यालये पश्चिम बाजूला आहेत, सर्व खासगी रुग्णालये, साखर कारखाने पश्चिम बाजूला, मुरगूड आदमापूर, सिद्धनेली, राधानगरी या गावांना जाणारा मार्ग पश्चिम बाजूला यामुळे रस्ता ओलांडून आणे अवघड होते. जे छोटे भुयारी मार्ग आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी आता कमी होईल.

कसरत कमी होणारकागल येथे जिल्ह्यातील मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. हजारो कामगार याठिकाणी रोजगारासाठी येतात. या औद्योगिक ये वसाहतीत जायचे असेल तर पूर्व बाजूपासून पश्चिम आणि पुन्हा पश्चिम बाजूवरून पूर्वेला कसरत करत यायला लागते. उडाणपुलामुळे हा त्रास वाचणार आहे.

बास्केट ब्रीजचाही 'डीपीआर' झाला तयार

  • सातारा-कागल महामार्गावर कागल शहरात उडाणपूल उभारण्याची मागणी होत होती. त्यानुसार या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उडाण पुलासह भरावाऐवजी पिलर टाकून पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्या पुलाचा तसेच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या बास्केट ब्रीजचा 'डीपीआर तयार केला आहे. या डीपीआर'नुसारचा निधी उपलब्धतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे येत्या १५ दिवसांत सादर केला जाणार आहे.

महामार्ग चौपदरीकरण कामात ज्या त्रुटी राहिल्या त्या सहापदरीकरण कामात राहू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहोत, कागल शहराजवळील उड्डाण पूल कराडच्या धर्तीवर भरावाऐवजी पिलरचा व्हावा यासाठी मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समितीने संघर्ष केला. - प्रताप ऊर्फ भय्या माने, अध्यक्ष-कृती समिती, कागल 

कागलना पिलरचा उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. आता महापुराची तीव्रता कमी होवून वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

पिलरच्या उड्डाण पुलामुळे कागलच्या नागरिकांसह शहरात ये-जा करणा-या सर्वांची सोय होणार आहे. वाहतूक सुटसुटीत होऊन प्रवाशांना फायदा होणार आहे. कागलच्या विकासाच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब आहे - आनंदराव दा. पाटील, निक्षा व्यावसायिक, कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गkagal-acकागलTrafficवाहतूक कोंडी