शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Kolhapur: अंबाबाई मंदिर विकासाची निघणार ४० कोटींची निविदा, आचारसंहिता संपताच प्रक्रिया सुरु

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 30, 2024 14:13 IST

४० कोटींत काय करणार..

इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ४० कोटींतून करावयाच्या कामांची निविदा आचारसंहिता संपताक्षणीच येत्या आठ-दहा दिवसांत काढण्यात येणार आहे. सध्या या निधीत करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रक करून ते तपासणीसाठी देण्यात आले आहे. ही निविदा प्रक्रिया संपेपर्यंत कोल्हापूर महापालिकेला निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे.लोकसभेची निवडणूक १६ मार्चला जाहीर झाली. त्याआधीच्या १५ दिवसांत राज्य शासनाने वेगवेगळ्या कामांसाठी निधी मंजुरीचा धडाका लावला. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेने २०१९ साली बनवलेल्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी मंजूर केले. या निधीचा रीतसर आदेशही निघाला. परंतु, रक्कम काही मिळाली नाही. लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घाईघाईने ही रक्कम जाहीर केली खरी, पण कोल्हापूर महापालिकेच्या खात्यावर वर्ग झालेली नाही.घोषणेची तेवढी घाई केलेल्या शासनाला निधी वर्ग करण्याचा विसर पडला की आचारसंहितेत रक्कम अडकली याबाबत प्रश्नच आहे. परंतु, महापालिकेच्या पातळीवर कामाची तयारी पूर्ण झाली आहे. ठेकेदाराला बिल देण्याची वेळ येते तेव्हा निधीचा प्रश्न उपस्थित होतो, तोपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तोपर्यंत कदाचित राज्य शासनाकडून निधी देखील वर्ग होईल, अशी अपेक्षा आहे.

निधीअभावी रखडले कामसरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग व भक्तनिवासाचे काम निधीअभावी रखडले आहे. येथे तळमजल्यापासून ५ व्या मजल्यापर्यंत पार्किंगची व्यवस्था आहे. सर्वात वरच्या दोन मजल्यावर भक्तनिवास असणार आहे. या कामाला २०१९ मध्ये सुरूवात झाली होती. पण, पहिल्या टप्प्यातील अडथळे आणि आता निधी नसल्याने काम रखडले आहे.

४० कोटींत काय करणारशासनाकडून येणाऱ्या ४० कोटींच्या निधीत सरस्वती टाॅकीज येथील बहुमजली पार्किंग व भक्तनिवासाचे काम पूर्ण केले जाईल. हीच रक्कम जवळपास ३० कोटींच्या आसपास जाते. उरलेल्या १० कोटींमध्ये व्हिनस कॉर्नर येथे उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतीचे काम करण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडून ४० कोटींच्या निधीचा आदेश निघाला आहे. प्रशासकीय मान्यता झाली की काम सुरू करण्यास हरकत नसते. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता संपताच सत्वर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. -नेत्रदीप सरनोबत शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर