शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्मार्ट प्रीपेड सक्तीविरोधात चळवळ राबवावी : प्रताप होगाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:35 IST

ग्राहकाच्या वीजबिलामध्ये प्रतियुनिट किमान ३० पैशांची वाढ होणार

इचलकरंजी : राज्यातील दोन कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. त्याची भरपाई काढण्यासाठी १ एप्रिल २०२५ पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीजबिलामध्ये प्रतियुनिट किमान ३० पैशांची वाढ होणार आहे. प्रीपेड मीटर सक्तीविरोधात राज्यातील जागरूक वीज ग्राहक, जाणकार कार्यकर्ते, ग्राहक प्रतिनिधी, वीज ग्राहक संघटना यांनी चळवळ आणि आंदोलन मोहीम चालवावी, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले.संपूर्ण राज्यातील शेती पंप वगळता वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी २७ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. एका मीटरला १२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी फक्त ९०० रुपये केंद्र सरकार अनुदान देणार आहे. उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्जरूपाने उभी करावी लागणार आहे. हे कर्ज, त्यावरील व्याज, घसारा, संबंधित अन्य खर्च, इत्यादी खर्चाची भरपाई राज्यातील वीज ग्राहकांकडून केली जाणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट किमान ३० पैसे वीज दर वाढणार आहे.स्मार्ट मीटर म्हणजे ‘नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे.’ देशातील बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना आहे. हा खासगीकरणाचा एक पुढचा टप्पा आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्यादृष्टीने कोणताही उपयोग नसलेल्या या स्मार्ट मीटरची सक्ती सर्वसामान्य ग्राहकांवर करता कामा नये. जादा दराने निविदा मंजूर केली आहे. त्यामागील ‘अर्थकारण’ कोणते आहे, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. अनेक राज्यांनी हे मीटर नाकारले आहेत. तरी याला नागरिकांनी तीव्र विरोध करावा.कोणताही लाभ नाही

  • वीज ग्राहक कायद्यानुसार आपले मीटर कोणते असावे, हे ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य व त्याचे कायदेशीर हक्क वीज ग्राहकांना आहेत.
  • सर्वसामान्य छोट्या घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना हे मीटर बसविल्यामुळे कोणताही भरीव लाभ होणार नाही.
  • राज्यातील २० किलो व्हॅटच्या आतील २० लाख व्यावसायिक ग्राहकांपैकी दहा लाख छोटे व्यावसायिक ग्राहक प्रत्येक महिन्याला १५०० ते २००० रुपये वीज भरणारे आहेत. असा गरजेपुरता वापर करणाऱ्या या ग्राहकांना स्मार्ट मीटरची गरजही नाही आणि फायदाही नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरण