शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे दर्शन! शाळेतल्या हिंदू मित्राने इकबालला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:58 IST

कोल्हापुरातील डांगे गल्लीतील इकबाल तांबोळी यांचा कपबशीने भरलेला गाडा जमावाने बुधवारच्या दंगलीमध्ये उलथून टाकला होता.

-मिलिंद यादव

इकबाल ! माझा शालेय मित्र. शालेय जीवन संपलं आणि जो-तो आपापल्या मार्गाला लागला. सांसारिक व्यापात प्रत्येकजण गुरफटून गेला. आज सारेच शालेय मित्र संपर्कात आहेत असं नाही. काही फोनवर, काही सोशल मीडियावर. पण, इकबाल मात्र बऱ्याच वेळा दिसायचा, तो रस्त्यावर. तो फेरीवाला झाला होता. जाता-येता कधीतरी आम्ही सामोरे यायचो. फार काही बोलणं व्हायचं नाही, पण... "कसा आहेस?' या माझ्या प्रश्नाला 'अरे, चाललंय बघ हे रोजचंच.' गाडीवर, आश्चर्य वाटावं अशा पद्धतीने रचलेल्या कपबश्यांकडे हात करत त्याचं उत्तर असायचं. या भेटीत लक्षात राहायचा तो त्याचा हसरा चेहरा आणि कसलाही गर्व नसलेली त्याची देहबोली.

काल सकाळी सकाळी चहा पीत असताना 'लोकमत'मध्ये छापून आलेले शहरातील दंगलीचे फोटो पाहात होतो. त्या अनेक फोटोंपैकी एका फोटोने माझे लक्ष विचलित झाले आणि चहात बुडवलेले बिस्कीट गळून पडले. तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, 'इकबाल'!

गाडीवरील कपबश्यांच्या ढिगाऱ्यासह जमावाने गाडी कशी उलटी रस्त्यावर आपटली असेल याची जाणीव होत होती, तो फोटो पाहून. नक्की माहीत नाही; पण शाहूराजांच्या स्मृतीसाठी असेल. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे असेल.

मी त्याक्षणी ठरवले की, इकबालला भेटायचं. त्याचा हा हातगाडीवरचा संसार पुन्हा उभा करायचा. त्याच्या घरी गेलो. इकबाल घरी नव्हता. त्याचा नंबर घेऊन फोन केला, तर हा गाडी दुरुस्त करायला गेलेला. इकबालला, तो होता तिथे जाऊन भेटलो. मला वाटलं होतं हा साधासुधा माणूस या घटनेनं खचला असेल. त्यानं नेहमीच्या हास्यमुद्रेनं माझं स्वागत केलं. मी म्हटलं, 'दोस्ता, तुला काय लागणार आहे सांग. तुझी गाडी परत सुरू झाली पाहिजे.' यावर हसत, नेहमीप्रमाणे डोळे बारीक करत तो जे बोलला, त्यातून माणूस म्हणून आपणही काही शिकण्यासारखे आहे. "अरे, जाऊ दे रे.. डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे. तू आपलेपणानं आलास... बोललास.. खूप झालं. करतोय प्रयत्न. आधी गाडी सरळ करतो."

मला तर इकबालमध्येच देवदर्शन झालं. त्यानं तर नुकसान करणाऱ्यांना एका दमात माफ करून टाकलं. गंमत म्हणजे इकबालची गाडी एक आपलाच बांधव दुरुस्त करत होता. ज्याचा या घडलेल्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याला हे मान्यच नसावं, हे त्या दोघांच्या संवादावरून लक्षात येत होतं. त्या दोघांचा धर्म एकच... 'राबणारा'.

संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. मुद्दाम बायको व मुलीला घेऊन गेलो. त्याची कारणं दोन: १. त्या घरात आत्मविश्वास यावा. २. पानसरेंनी मला दिलेली विचारांची शिदोरी पुढच्या पिढीकडे, कोणत्याही प्रबोधनवर्गाशिवाय कृतीने जावी. डोक्यात आलेल्या रकमेचं पाकीट त्याच्या हातात दिलं. 'दोस्ता, आणि काय लागलं तर न लाजता हक्काने माग.' इकबाल म्हणाला, "अरे, नाही रे. तू आठवण ठेवून मदत केलीस हेच खूप झालं," मित्रांनो, समाजातील एकोपा, चांगुलपणा टिकवायचा असेल तर असेच करायला हवे. मी केले.. तुम्ही करा.. आपण करूया.....

टॅग्स :kolhapurकोल्हापूर