शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Kolhapur News- बेडकाचे लावले लग्न, गाढवावरून काढली वाजत गाजत मिरवणूक; पावसासाठी 'या' गावात अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:47 IST

पावसाने दडी मारली, मृगनक्षत्र ही कोरडे गेले

उत्कर्षा पोतदार उत्तूर : उत्तूर येथे वळीव पावसाने दडी मारली,  त्यानंतर मृगनक्षत्र ही कोरडे गेले. त्यामुळे ऊस पिके वाळली, भाताची पेरणी पावसा अभावी खोळंबली, विहिरी, धरणे कोरडी पडली आहेत. सर्वत्र पाण्याविना नागरीकांचे हाल होत आहेत. ते दूर करण्यासाठी नागरिकांनी बेडूक व बेडकीचे लग्न लावून त्यांची गाढवावरून मिरवणूक काढली.   रोहिणीचा पेरा कोरडा गेला, मृग नक्षत्र ही वाया गेले. परंतु पावसाचा एक थेंब नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने पावसाला साकडे घालण्यासाठी उत्तूर मध्ये बेडूक व बेडकीचे लग्न लावण्यात आले. त्यासाठी एका पातेल्यामध्ये बेडूक व बेडकी ठेवून त्यांना हळद-कुंकू लावून त्यांचे लग्न लावण्यात आले.नंतर गाढवाला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली. त्या गाढवाच्या पाठीवर बेडूक व बेडकी ठेवलेले पातेले ठेवून गावातील प्रत्येक देवळात पानविडा ठेवून व नारळ फोडून पावसासाठी देवी देवतांना साकडे घालण्यात आले. ज्या ठिकाणाहून मिरवणूक काढली त्याच ठिकाणी मिरवणूक आणून हे गाऱ्हाणे पुर्ण केले. 

 यावर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. उत्तूरमध्ये नदी नसल्याने पाण्यासाठी लोक घागरी घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. अजून आठवडाभर जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ सदृश्य स्थिती होईल. पाऊस पडण्यासाठी पारंपारिक पद्धतीने बेडूक व बेडकीचे लग्न लावून गाढवावरून त्यांची मिरवणूक काढतात. - जगदीश हावळ  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस