शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

आर्थिक विवंचनेतून शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:02 IST

प्रा. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत होते.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागातील कंत्राटी प्राध्यापक डॉ. शैलेश रमाकांत वाघमारे (वय ३८, मूळ रा. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (दि. २१) रात्री उशिरा त्यांचा मृतदेह राजाराम तलावात आढळला. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी प्रा. वाघमारे यांच्याकडे पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. पत्नीची मणक्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने त्यांनी २३ फेब्रुवारी ते एक मार्चदरम्यान विभागातून रजा घेतली होती. मंगळवारी रात्री आठपर्यंत ते मायक्रोबायोलॉजी विभागात होते.त्यानंतर त्यांचा मोबाइल स्विचऑफ लागत असल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. प्रा. वाघमारे बेपत्ता असल्याचे समजताच विद्यापीठातील त्यांच्या मित्रांनीही शोधाशोध सुरू केली.रात्री उशिरा राजाराम तलावाजवळ एका विद्यार्थ्याला प्रा. वाघमारे यांची दुचाकी दिसली. त्यानंतर विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह तलावात पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली.पोलिसांना मिळाली सुसाइड नोटप्रा. वाघमारे यांच्याजवळ पोलिसांना सुसाइड नोट मिळाली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख प्रा. वाघमारे यांनी त्यामध्ये केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. ते मोरेवाडी येथे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.

आर्थिक विवंचनाप्रा. वाघमारे यांना वर्षातील ११ महिने दरमहा ३२ हजार रुपयांचे वेतन विद्यापीठाकडून मिळत होते. गेली १२ वर्षे त्यांनी तासिका तत्त्व आणि कंत्राटी पद्धतीने काम केले. पूर्णवेळ प्राध्यापक भरतीची संधी मिळत नसल्याने त्यांना तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत होता. याच विवंचनेतून त्यांनी जीवनयात्रा संपवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठProfessorप्राध्यापक