शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धान्याचा पुरेसा साठा, मालवाहतूक मात्र ९० टक्के बंद; अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ४८ मार्ग बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 16:08 IST

कोल्हा पूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ११ राज्य मार्ग व ३७ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ४८ मार्ग बंद झाले ...

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ११ राज्य मार्ग व ३७ प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ४८ मार्ग बंद झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी धान्यांसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वीच पुरेसा धान्य साठा केल्याने नागरिकांना धान्य तुडवड्याची काळजी नाही. काही व्यापाऱ्यांच्या मार्केट यार्डातील गोदामात हा साठा पुरेसा आहे. मात्र, राज्यातील पूरस्थितीचा अंदाज घेऊन ट्रक आणि टेम्पो वाहतूक ९० टक्के बंद आहे. आंतरराज्य वाहतुकीसाठी चालकच तयार नसल्याने ही वाहतूक थांबली आहे.अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी प्रवासी आणि मालवाहतूक बंद आहे. कोल्हापूरच्या धान्य बाजारपेठेत लातूरवरून तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळीसह सर्व प्रकारच्या डाळींची आवक होते. मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गहू येतो. कर्नाटकातील तेंदनूर, रायचूर परिसर आणि नाशिक, नागपूर परिसरातून तांदूळ आवक केला जातो. कोल्हापुरातून गोवा, कोकण, कर्नाटकात धान्य, साखर, सर्व प्रकारची कडधान्ये, भाजीपाला वाहतूक केली जाते. अद्याप राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुुरू असल्याने माल पाठवण्यास किंवा आणण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. कोकणात जाणारी वाहतूक मात्र पर्यायी मार्गे वळविली आहे.

मालवाहतुकीची चाके थांबलीकोल्हापुरातून राजस्थान आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणातून मालवाहतूक होते. दोन्ही राज्यांत आवक-जावक होते. राजकोट, सुरत, अहमदाबाद, मोरवी, पाली, जोधपूरसह परिसरातील १० हून अधिक शहरात साखर पाठवली जाते. उद्योगाला लागणारे स्पेअर पार्टची निर्यात होते. इचलकरंजी येथे तयार होणारे कापडही राजस्थानला जाते. या रोज ५० हून अधिक जाणारे मालवाहतुकीचे केवळ १० ट्रक जात आहेत.

१६ हजार ट्रक आणि ३ हजार टेम्पोकोल्हापूर जिल्ह्यात ट्रकची संख्या १६ हजार आहे. पैकी ४ हजारांहून अधिक ट्रक मालवाहतूक करतात. त्यात ७ टनांच्या आतील टेम्पो (आयशर)ची संख्या ३ हजार आहे. कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजीतून आंतरराज्य मालाची वाहतूक करणारी ट्रकही मोठ्या संख्येने आहेत.

धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पावसाळ्यापूर्वी बहुतांशी व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक लागणारे सर्व साहित्य आयात केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही. -वैभव सावर्डेकर, संचालक, धान्य व्यापारी संघटना 

गुजरात, राजस्थानसह अन्य ठिकाणी जाणारी मालवाहतूक बंद आहे. अतिवृष्टीमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहनावर चालक जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे मालवाहतूक थांबली आहे. - भाऊ घोगळे, उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशन

खाद्यतेलाचा पुरेसा साठा कोल्हापुरात उपलब्ध आहे. जरी आवक बंद झाली तरी वर्षभर पुरेल इतका खाद्यतेलाचा साठा आहे. - प्रदीपभाई कापडिया, अध्यक्ष, किराणा असोसिएशन आणि तेल व्यापारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरTrafficवाहतूक कोंडी