शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बदलीसाठी ८० शिक्षकांनी दिली खोटी माहिती -आॅनलाईन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:05 IST

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. यातील सर्व खोटेपणाचा अभ्यास करून ज्यांनी खरोखरच गंभीर अशी खोटी माहिती ...

ठळक मुद्देसर्वाधिक हातकणंगलेतील; कागदपत्रांची छाननी, दोषींना बसणार झटका

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. यातील सर्व खोटेपणाचा अभ्यास करून ज्यांनी खरोखरच गंभीर अशी खोटी माहिती दिली आहे अशा शिक्षकांच्या पुन्हा बदल्या करण्यात येणार आहेत तसेच काहीजणांविरोधात शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºया संवर्गामध्ये ‘सुगम-दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यातील दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ‘कारणे दाखवा नोटिसा’ बजावल्या होत्या.तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून सर्वच बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार छाननी केली असता ८० शिक्षकांना चुकीची माहिती भरल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व शिक्षकांची कागदपत्रे शिक्षण विभागाकडे जमा करण्यात आली आहेत.खोेटे अंतर, खोटा आजारकाहींनी नसलेला आजार आपल्याला किंवा मुलाला झाल्याचे सर्टिफिकेट घेतले आहे तर काहींनी अंतर दाखवताना जवळचे दाखवण्याऐवजी एस. टी. ज्या मार्गाने जाते तो मार्ग दाखवला आहे. काहींनी शाळा दुर्गम नसताना ती दाखवली आहे. अशा अनेक पद्धतीने शिक्षक, शिक्षिकांनी एकतर बदली सोयीची होण्यासाठी किंवा गैरसोयीची होऊ नये यासाठी हा कारभार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा