शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: इचलकरंजीचे ७० टक्के दूषित पाणी थेट पंचगंगेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:26 IST

दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

अतुल आंबीइचलकरंजी : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आजतागायत पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने सुमारे ७० टक्के मैलामिश्रित सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळणे सुरूच आहे. त्यामुळे कोल्हापूरनंतर इचलकरंजीच प्रदूषणाला जबाबदार मुख्य घटक ठरत आहे. उन्हाळ्यात जाणवणारी प्रदूषणाची तीव्रता आता पावसाळा सुरू झाल्यानंतर दुर्लक्षित होते. परिणामी, किमान डिसेंबरपर्यंत नदी प्रदूषणाचा विषय दुर्लक्षित राहतो. याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. इचलकरंजी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. नव्याने निर्माण होणाऱ्या २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) चे काम संथगतीने सुरू आहे, तर जुनी २० दशलक्ष लिटर क्षमतेची यंत्रणा कालबाह्य असून, वारंवार बंद पडत असते. परिणामी, दररोज निर्माण होणाऱ्या ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यातील सुमारे ७० टक्के सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. दिखाव्यापुरती तोकडी यंत्रणा सध्या कार्यान्वित असून, अनेकवेळा त्याच त्या पाण्यावर प्रक्रिया होते, तर संपवेल बंद पडला की पाणी थेट नदीत मिसळते.शहरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ दशलक्ष लिटर क्षमतेचा सीईटीपी (रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) कार्यान्वित आहे. परंतु, नवीन नियमानुसार त्यांना झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प राबविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मैलखड्डा परिसरात जागा घेऊन १५ दशलक्ष लिटर क्षमतेचा झेडएलडीचा प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली असून, पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचे काम सुरू होणार आहे.एकूणच सध्या इचलकरंजी शहरातून प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच या विभागाकडून पाहणी आणि नमुने घेतले जातात. या नमुन्याचे पुढे काय होते, याचा कधीच शोध लागत नाही. त्याचबरोबर पुढील सोपस्कर पूर्ण करण्यासाठी म्हणून मंडळाकडून महापालिकेला नोटीस दिली जाते. १५ वर्षात अशा कित्येक नोटीस पालिकेला मिळाल्या असतील. परंतु, वीस दशलक्ष लिटरच्या नवीन एसटीपी प्रकल्पाच्या मंजुरीव्यतिरिक्त काहीच महत्त्वपूर्ण सुधारणा अथवा उपाययोजना दिसत नाही.

कलानगर ओढ्यावर प्रक्रिया नाहीचसध्या शहरातील काळा ओढा, कलानगर चंदूर ओढा यातून शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. त्याचबरोबर काही रंगण्यांचे (साध्या कापडाला रंगीत करणारे छोटे कारखाने) पाणी ओढ्यातून नदीत मिसळते.

दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेतमहापालिकेने कलानगर ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेरा दशलक्ष लिटरचा आणि टाकवडे वेस येथील जागेत आणखीन १९ दशलक्ष लिटरचा असे दोन एसटीपी शासनाकडे मागितले आहेत. ते दोन्ही प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.दृष्टिक्षेपात

  • इचलकरंजी शहर लोकसंख्या - सुमारे चार लाख
  • नळजोडणी - ४३ हजार
  • औद्योगिक नळजोडणी - तीन हजार
  • कूपनलिका - ७२०, २१० हातपंप
  • खासगी कूपनलिका - २५००
  • निर्माण होणारे सांडपाणी - ४० (दशलक्ष लिटर)
  • सध्याचा एसटीपी - २० (दशलक्ष लिटर)
  • नवीन मंजूर एसटीपी - २० (दशलक्ष लिटर)
  • मंजूर - प्रक्रियेत १३ व १९ (दशलक्ष लिटर)
  • सध्याचा सीईटीपी - ९ (दशलक्ष लिटर)
  • मंजूर प्रक्रियेतील झेडएलडी - १५ (दशलक्ष लिटर) 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण