शहरं
Join us  
Trending Stories
1
"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार ४७२ कोटींची कर्जमाफी; सततच्या घोषणांनी थकबाकीत वाढ

By राजाराम लोंढे | Updated: November 1, 2025 19:05 IST

वसुलीसाठी विकास संस्थांसह बँकांची होणार दमछाक

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने गेल्या १० वर्षांत दोन वेळा कर्जमाफी केली आहे, आता तिसऱ्यांदा घोषणा केली असून, कोल्हापूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ६१ हजार ७६२ शेतकऱ्यांकडे तब्बल ४७२ कोटी २० लाखांची थकबाकी आहे. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर मागील वर्षात शेतकऱ्यांची पैसे भरण्याची मानसिकता झाली, त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगला असून, मागील दोन कर्जमाफीपेक्षा दुपटीने आकडा वाढला आहे. जूनपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिल्याने चालू पीक कर्ज भरताना शेतकरी हात आखडता घेणार असून विकास संस्थांसह बँकांना त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे.केंद्र सरकारच्या २००८च्या कर्जमाफीनंतर राज्य सरकारने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना लाभ दिला. विधानसभेच्या मागील निवडणुकीत महायुतीच्या वतीने कर्जमाफीची घोषणा केली. महायुती सत्तेवर येऊन वर्ष झाले; पण, कर्जमाफी होणार या अपेक्षेने शेतकरी बसला आहे. त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. गेल्या वर्षी विकास संस्थांच्या पातळीवर शेतकऱ्यांकडे ४७२.२० कोटींची थकबाकी राहिली आहे.

कर्जमाफी करायची तर सरसकट करादोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाते. मात्र, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्याला ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले. यामुळे, विविध उलाढाली करून कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. यासाठी शासनाने सरसकट (थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाऱ्यांना) कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे.जळाऊ लाकूड ७ हजार आणि ऊस ३ हजारांनी टनबाजारातील जळाऊ लाकूड प्रतिटन सात हजार रुपयांना विकले जाते. मात्र, १५ महिने घाम गाळून पिकवलेला ऊस तीन हजार रुपये दराने विकावा लागतो, हे या देशातील वास्तव आहे. जोपर्यंत शेतीमालाच्या भावाचे दुखणे बरे होणार नाही, तोपर्यंत कितीही कर्जमाफी करा; शेतकरी आर्थिक गर्तेतून बाहेर पडणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या दहा वर्षांत अशी झाली कर्जमाफीयोजना - थकीत शेतकरी (संख्या) - कर्जमाफी ( कोटी) - नियमित परतफेड करणारे (संख्या) - प्रोत्साहन अनुदान ( कोटी)

  • छत्रपती शिवाजी महाराज - २०,२८२ - ७१.१८ - १,७६,०३६ - २८६ 
  • महात्मा जोतीराव फुले - ४८,८५७ - २८५ - १,५३,८८९ - २८९ 

महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने कर्जमाफी दिली पाहिजे; पण, सतत कर्जमाफी हा यावरील उपाय नव्हे, त्याने घाम गाळून पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळाला तर याची गरजही भासणार नाही, हेच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी सांगत होते. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलली पाहिजेत. - प्रा. डॉ. जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष, शेतकरी सेना)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Farmers Await Loan Waiver Amidst Rising Debt Burden

Web Summary : Kolhapur's 61,000 farmers face ₹472 crore debt. Repeated loan waiver promises inflate dues as farmers delay payments, impacting banks. Experts advocate fair crop prices over waivers.