शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार ४७२ कोटींची कर्जमाफी; सततच्या घोषणांनी थकबाकीत वाढ

By राजाराम लोंढे | Updated: November 1, 2025 19:05 IST

वसुलीसाठी विकास संस्थांसह बँकांची होणार दमछाक

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने गेल्या १० वर्षांत दोन वेळा कर्जमाफी केली आहे, आता तिसऱ्यांदा घोषणा केली असून, कोल्हापूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ६१ हजार ७६२ शेतकऱ्यांकडे तब्बल ४७२ कोटी २० लाखांची थकबाकी आहे. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर मागील वर्षात शेतकऱ्यांची पैसे भरण्याची मानसिकता झाली, त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगला असून, मागील दोन कर्जमाफीपेक्षा दुपटीने आकडा वाढला आहे. जूनपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिल्याने चालू पीक कर्ज भरताना शेतकरी हात आखडता घेणार असून विकास संस्थांसह बँकांना त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे.केंद्र सरकारच्या २००८च्या कर्जमाफीनंतर राज्य सरकारने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना लाभ दिला. विधानसभेच्या मागील निवडणुकीत महायुतीच्या वतीने कर्जमाफीची घोषणा केली. महायुती सत्तेवर येऊन वर्ष झाले; पण, कर्जमाफी होणार या अपेक्षेने शेतकरी बसला आहे. त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. गेल्या वर्षी विकास संस्थांच्या पातळीवर शेतकऱ्यांकडे ४७२.२० कोटींची थकबाकी राहिली आहे.

कर्जमाफी करायची तर सरसकट करादोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाते. मात्र, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्याला ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले. यामुळे, विविध उलाढाली करून कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. यासाठी शासनाने सरसकट (थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाऱ्यांना) कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे.जळाऊ लाकूड ७ हजार आणि ऊस ३ हजारांनी टनबाजारातील जळाऊ लाकूड प्रतिटन सात हजार रुपयांना विकले जाते. मात्र, १५ महिने घाम गाळून पिकवलेला ऊस तीन हजार रुपये दराने विकावा लागतो, हे या देशातील वास्तव आहे. जोपर्यंत शेतीमालाच्या भावाचे दुखणे बरे होणार नाही, तोपर्यंत कितीही कर्जमाफी करा; शेतकरी आर्थिक गर्तेतून बाहेर पडणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या दहा वर्षांत अशी झाली कर्जमाफीयोजना - थकीत शेतकरी (संख्या) - कर्जमाफी ( कोटी) - नियमित परतफेड करणारे (संख्या) - प्रोत्साहन अनुदान ( कोटी)

  • छत्रपती शिवाजी महाराज - २०,२८२ - ७१.१८ - १,७६,०३६ - २८६ 
  • महात्मा जोतीराव फुले - ४८,८५७ - २८५ - १,५३,८८९ - २८९ 

महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने कर्जमाफी दिली पाहिजे; पण, सतत कर्जमाफी हा यावरील उपाय नव्हे, त्याने घाम गाळून पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळाला तर याची गरजही भासणार नाही, हेच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी सांगत होते. त्या दृष्टीने सरकारने पावले उचलली पाहिजेत. - प्रा. डॉ. जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष, शेतकरी सेना)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Farmers Await Loan Waiver Amidst Rising Debt Burden

Web Summary : Kolhapur's 61,000 farmers face ₹472 crore debt. Repeated loan waiver promises inflate dues as farmers delay payments, impacting banks. Experts advocate fair crop prices over waivers.