शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

५५७ प्राथमिक शाळा डिजिटल

By admin | Updated: December 10, 2015 00:53 IST

जिल्हा परिषद : अध्यापन सुलभ होण्यासाठी होतेय मदत...

रत्नागिरी : विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून, अध्ययन व अध्यापनामध्येही त्याचा वापर वाढला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बुध्दिमत्ता, आकलन क्षमता भिन्न आहे. दृकश्राव्य माध्यमामुळे विद्यार्थ्यांना आकलन लवकर होत असल्यामुळे अध्यापन सुलभ होत आहे. डोळे व कान ही दोन्ही इंद्रिये पडद्याकडे केंद्रीत असल्याने अध्यापनाची उत्सुकता वाढते, शिवाय आकलनही लवकर होते. रत्नागिरी जिल्ह्यातील २७३९पैकी ५५७ शाळा डिजिटल झाल्या आहेत.डिजिटल म्हणजे एलसीडी प्रोजेक्टर व टॅबचा वापर करून विद्यार्थांना ‘ई - लर्निग’ पध्दतीने अध्यापन करण्यात येते. कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये टॅब सुविधा उपयुक्त ठरत आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये एक टॅब दिला जातो. जिल्ह्यातील ४४० शाळांमध्ये टॅब देण्यात आला आहे. तसेच ११७ शाळांमध्ये एलसीडी प्रोजेक्टर देण्यात आला असून, त्याव्दारे ई - लर्निंग करण्यात येत आहे. काही शाळांनी संगणक बसविले आहेत. खासगी शाळामध्ये तर खासगी कंपन्यामार्फत सुरू करण्यात आलेली ई - लर्निंग प्रणालीसर्व्हरव्दारे जोडण्यात आली आहे.सर्व्हरव्दारे प्रत्येक वर्गात पडदा व मॉनिटर जोडण्यात आले आहे. स्टाफरूममध्ये सर्व्हर बसवण्यात आलेला असतो. जो टॉपिक शिकवायचा असेल त्याची तयारी आधी करून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी मॉनिटर सुरू करून वर्गामध्ये त्या विषयाचे अध्यापन सुरू केले जाते. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे आकलन चटकन होते.साहित्य असो वा विज्ञान, इतिहास असो वा भूगोल, संबंधित विषयाची माहिती व त्याबद्दल सर्व माहिती ई - लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येते. एकूणच एखादा विषय समजावण्यासाठी एक ते दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक तास लागत असतील, तर या प्रणालीमुळे तोच विषय ३० ते ४० मिनिटात शिकवता येतो. वाचून किंवा समजावूनसुध्दा कळत नाही, त्या विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाचा फायदा होत आहे. रत्नागिरी शहरातील खासगी शाळांमध्ये या प्रणालीचा वापर चार वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ई - प्रणाली वापर गतवर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. हळूहळू ही प्रणाली सर्व शाळांमध्ये सुरू होणार आहे. या प्रणालीव्दारे कोणत्याही विषयाचे अध्यापन करीत असताना संबंधित विषयाची अधिकची माहिती व चित्र दाखवण्यात येतात. साहित्याचे अध्यापन करताना संबंधित लेखक त्याचे कार्य, अन्य साहित्य याबाबत माहिती देण्यात येते. जेणेकरून चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे तो विषय विद्यार्थ्यांना चटकन आकलन होण्यास मदत होते.पुस्तकामध्ये एखाद्या विषयाचे एखाददुसरे चित्र असते. मात्र, ई - लर्निंगमध्ये हजारो चित्र दाखवता येतात, त्यामुळे संबंधित अध्यापन प्रणाली उपयुक्त ठरत आहे.(प्रतिनिधी)ई-लर्निंग प्रणाली : अधिकाधिक शाळा जोडल्या जाणारजिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये ई - लर्निंग प्रणालीअंतर्गत ११७ शाळांतून एलसीडी प्रोजेक्टर बसवण्यात आले आहेत, तर ४४० शाळांना टॅबव्दारे ई - लर्निंगचे धडे देण्यात येत आहेत. ज्ञानरचना वादानुसार १२८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरचा वापर करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्ता अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक शाळा ई-लर्निंगव्दारे जोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.सुलभ प्रणालीछोट्या मुलांना चित्राव्दारे शिकवल्यास ते चटकन आकलन करतात. शिवाय विद्यार्थ्यांनाही त्यामध्ये गोडी निर्माण होते. ई-लर्निंग प्रणालीमध्ये एखाद्या विषयाची हजारो चित्र दाखवता येत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही गोडी निर्माण झाली आहे.