शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

बेळगावात दंगलप्रकरणी ५५ अटकेत

By admin | Updated: July 14, 2015 01:14 IST

गांधीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केला होता हवेत गोळीबार

बेळगाव : येथील गांधीनगरमध्ये रविवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी ५५ जणांना अटक केली आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून ही घटना घडली होती. सोमवारी दिवसभर बेळगावमध्ये तणावपूर्ण शांतता होती. रविवारी रात्री दंगलखोरांनी तुफान दगडफेक केली होती. जमावाने ३० पेक्षा जास्त दुचाकी व चारचाकी गाड्यांची तसेच अनेक घरांची तोडफोड केली होती. पोलिसांचे एक वाहनही पेटविले. दगडफेकीत २० जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एक पोलीस अधिकारी, सहा पोलिसांचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या आठ नळकांड्या फोडाव्या लागल्या; तरीही जमाव नियत्रंणात आला नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यावर जमाव पांगला आणि परिस्थिती थोडी नियंत्रणात आली. सध्या गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी दुपारी कन्नड शाळेच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यातील किरकोळ कारणामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दंगलीबाबत अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. परगावांहून पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत ५५ जणांना अटक केली आहे. रविवारी दुपारी सरकारी कन्नड, मराठी आणि उर्दू शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी एका व्यक्तीने हरकत घेतली. याला दुसऱ्या गटाच्या पालकांनी विरोध केला. नंतर हे प्रकरण इतरांनी हस्तक्षेप करून मिटविले. क्रिकेट खेळताना पुन्हा दोन संघात वाद निर्माण झाला. नंतर मैदान रिकामे करण्याची मागणी करण्यात आली. त्यास दुसऱ्या गटाने हरकत घेतली. त्यातून दोन्ही गटांत वादावादी झाल्यावर हे प्रकरण मिटविण्यात आले; पण रविवारी रात्री मैदानावरील वादाने हिंसक वळण घेतले. एका गटाच्या जमावाने आपल्या मुलांना मैदानावर खेळू दिले नाही म्हणून दुर्गामाता रोडवर पार्क करण्यात आलेल्या वाहनांची मोडतोड, जाळपोळ करण्यास सुरुवात केली. याला तेथील रहिवाशांकडून प्रतिकार केला. रात्री अकरा वाजता पोलिसांना हिंसाचाराची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे गेले, तर त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहन पेटविण्यात आले. नंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस आयुक्त एस. रवि, पोलीस उपायुक्त अनुपम अगरवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी गांधीनगर येथे धाव घेतली. पोलीस कुमकही मागवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली. सध्या गांधीनगर भागात १४४ कलम लावण्यात आले आहे . (प्रतिनिधी)