शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कृषी विभागातील राज्यातील ५२५ कर्मचारी मानधनवाढीच्या प्रतीक्षेत

By संदीप आडनाईक | Updated: December 6, 2023 13:09 IST

तेरा वर्षांपासून मागणी प्रलंबित : आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली

संदीप आडनाईककोल्हापूर : कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेमध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (एटीएम) आणि संगणक रूपरेखक (सीपी) या पदांवर काम करणारे राज्यातील कर्मचारी १३ वर्षांपासून एकत्रित मानधनावर काम करत आहेत. आत्मा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मानधनवाढ लागू केली असली तरी राज्यातील ५२५ कर्मचारी २०१७ पासून मानधनवाढीपासून वंचित आहेत.

कृषी खात्याच्या आयुक्तांनी स्वत: लिहिलेल्या पत्रालाही राज्य शासनाने केराची टोपली दाखवलेली आहे. यासंदर्भात संसद सदस्य, कृषी मंत्रालय यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यालाही यश मिळालेले नाही. तत्कालीन कृषी आयुक्तांनी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालयाकडे दि. २९ मार्च २०२३ रोजी मानधनवाढीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. केंद्र सरकारच्या आत्मा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे २०१४ मध्ये नमूद केल्यानुसार या कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकत्रित मानधनावर १० टक्के मानधनवाढ देय आहे.

मात्र, २०१४ ते २०१६ या कालावधीत एकत्रितच्या ऐवजी मूळ मानधनावर १० टक्क्यांप्रमाणे मानधनवाढ दिली आहे. परंतु सन २०१७ पासून आजपर्यंत सन २०१८ च्या आत्मा मार्गदर्शक सूचनेनुसार मानधनवाढ लागू केलेली नाही. या प्रलंबित मानधनवाढीबाबत राज्यातील सर्व आत्मा कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे वेळोवेळी विविध मार्गाने पाठपुरावा केलेला आहे.

या विविध योजनांची जबाबदारीहेच कर्मचारी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या आत्मा योजनेसह परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), विकेल ते पिकेल, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना, पीओकेआरए, नैसर्गिक शेती यासारख्या विविध योजनांची अतिरिक्त कामे प्रभावीपणे आणि विनातक्रार प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. शिवाय तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी सोपवलेल्या विविध जबाबदाऱ्याही सांभाळतात ते वेगळेच.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र