शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील राज्यातील ५२५ कर्मचारी मानधनवाढीच्या प्रतीक्षेत

By संदीप आडनाईक | Updated: December 6, 2023 13:09 IST

तेरा वर्षांपासून मागणी प्रलंबित : आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली

संदीप आडनाईककोल्हापूर : कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेमध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (एटीएम) आणि संगणक रूपरेखक (सीपी) या पदांवर काम करणारे राज्यातील कर्मचारी १३ वर्षांपासून एकत्रित मानधनावर काम करत आहेत. आत्मा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मानधनवाढ लागू केली असली तरी राज्यातील ५२५ कर्मचारी २०१७ पासून मानधनवाढीपासून वंचित आहेत.

कृषी खात्याच्या आयुक्तांनी स्वत: लिहिलेल्या पत्रालाही राज्य शासनाने केराची टोपली दाखवलेली आहे. यासंदर्भात संसद सदस्य, कृषी मंत्रालय यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यालाही यश मिळालेले नाही. तत्कालीन कृषी आयुक्तांनी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रालयाकडे दि. २९ मार्च २०२३ रोजी मानधनवाढीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. केंद्र सरकारच्या आत्मा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे २०१४ मध्ये नमूद केल्यानुसार या कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकत्रित मानधनावर १० टक्के मानधनवाढ देय आहे.

मात्र, २०१४ ते २०१६ या कालावधीत एकत्रितच्या ऐवजी मूळ मानधनावर १० टक्क्यांप्रमाणे मानधनवाढ दिली आहे. परंतु सन २०१७ पासून आजपर्यंत सन २०१८ च्या आत्मा मार्गदर्शक सूचनेनुसार मानधनवाढ लागू केलेली नाही. या प्रलंबित मानधनवाढीबाबत राज्यातील सर्व आत्मा कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे वेळोवेळी विविध मार्गाने पाठपुरावा केलेला आहे.

या विविध योजनांची जबाबदारीहेच कर्मचारी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या आत्मा योजनेसह परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), विकेल ते पिकेल, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना, पीओकेआरए, नैसर्गिक शेती यासारख्या विविध योजनांची अतिरिक्त कामे प्रभावीपणे आणि विनातक्रार प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. शिवाय तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी सोपवलेल्या विविध जबाबदाऱ्याही सांभाळतात ते वेगळेच.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र