शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापुरात स्वातंत्र्यसैनिकांना ५० घरे मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:02 IST

कोल्हापूर : शहराजवळ २५० घरांची योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असून, यातील ५० घरे ही स्वातंत्र्यसैनिकांना मोफत दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली असल्याने विकासाला निधीची कमतरता नाही, त्यामुळे समाजात प्रगतीबरोबरच सकारात्मक विचारांची सुरुवात होण्याची गरज असल्याची भावनाही त्यांनी ...

कोल्हापूर : शहराजवळ २५० घरांची योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असून, यातील ५० घरे ही स्वातंत्र्यसैनिकांना मोफत दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली असल्याने विकासाला निधीची कमतरता नाही, त्यामुळे समाजात प्रगतीबरोबरच सकारात्मक विचारांची सुरुवात होण्याची गरज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित केला होता. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन केले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर शोभाताई बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना पालकमंत्र्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर २५० घरांचा प्रकल्प हाती घेतला असून, ५०० स्क्वेअर फुटांचे घर केवळ १५०० रुपये स्क्वेअर फूट दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातील ५० घरे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदणी असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना मोफत दिली जाणार आहेत. या प्रकल्पात खेळाडू, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.‘जीएसटी’मुळे ४३ हजार कोटी जमामहाराष्ट्रात ‘जीएसटी’मुळे गेल्या वर्षी ४३ हजार कोटी रुपये महसूल जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत जी.एस.टी.मुळे तीन हजार कोटींचे उत्पन्न वाढले आहे; तसेच मुद्रांक विभागामार्फत यंदा २६ हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच हजार कोटींनी उत्पन्न वाढले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.शहीद जवानाच्या वारसांना २५ लाखांची मदतशहीद जवान हवालदार अनंत जानबा धुरी यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाखांची आर्थिक मदत पालकमंत्र्यांच्या हस्ते वारसांना देण्यात आली. वडील जानबा धुरी यांनी ही मदत स्वीकारली.‘माझी कन्या भाग्यश्री’ अंतर्गत मुदतठेव प्रमाणपत्र‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेंतर्गत परिणती प्रकाश शेलार हिच्या पालकांना ५० हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले.राज्यात होणार २२ हजारकि.मी.चे राष्टÑीय महामार्गपालकमंत्री म्हणाले, राज्यात पाच हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते, ते आता २२ हजार किलोमीटरचे हाती घेतले आहेत. राज्याला केंद्राकडून १ लाख ६ हजार कोटी रुपये मिळाले असून, या निधीतून एक-दोन वर्षांत रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील. याबरोबरच नव्याने सहा हजार कोटींचे रस्ते हाती घेतले आहेत; सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० हजार कि.मी.च्या तीनपदरी, चौपदरी तसेच सहापदरी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात २ हजार ३२ कोटी रुपयांची ८७० कामे सुरू केली आहेत.राज्यातील ४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणणारराज्यातील सध्या १८ टक्के सिंचनाखाली असणारे क्षेत्र वाढवून ते ४० टक्क्यांपर्यंत नेण्यास प्राधान्य दिले आहे.केंद्र शासनाकडून १४ हजार कोटींचा निधी कर्जरूपाने मिळाल्याने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील आठ धरण प्रकल्प यामुळे मार्गी लागतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.