आजऱ्यात २६ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:18+5:302021-01-08T05:18:18+5:30
आजरा : तालुक्यातील २६पैकी ५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यात १५ ठिकाणी दुरंगी तर ६ ठिकाणी तिरंगी लढत ...

आजऱ्यात २६ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध
आजरा : तालुक्यातील २६पैकी ५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यात १५ ठिकाणी दुरंगी तर ६ ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. खोराटवाडी व एरंडोळ गावांची निवडणूक बिनविरोध झाली. परंतु, जातीचा दाखला न मिळाल्याने एक जागा रिक्त राहिली आहे. होनेवाडीची निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध झाली असून, उमेदवारीच्या लिलावामुळे गाजलेली गवसे येथील निवडणूकही बिनविरोध झाली आहे.
वाटंगीत ५ जागा बिनविरोध तर ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी २३८ जणांनी माघार घेतली तर २०६ जागांसाठी ४२५ जण रिंगणात आहेत.
तालुक्यात पक्षीय ऐवजी गटनिहाय व व्यक्तीकेंद्रीत निवडणुका होत आहेत. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आघाड्या केल्या आहेत. देवर्डे, सुळे, शिरसंगी, चिमणे, किणे, बेलेवाडी याठिकाणी तिरंगी तर महागोंड, मुमेवाडी, चव्हाणवाडी, जाधेवाडी, हालेवाडी, देवकांडगाव, हाळोली, हत्तीवडे, कासारकांडगाव, मुरूडे, निंगुडगे, सरोळी, कोवाडे, मलिग्रे, वाटंगी याठिकाणी दुरंगी लढत होत आहे.