शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

अवकाळीच्या पावसातील नुकसानीचा ३० टक्के निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:30 IST

कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या ...

ठळक मुद्देशासन निर्णय : जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ लाख ६५ हजार : चार दिवसांत वाटप

कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय सोमवारी (दि. १८) घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३० टक्के निधी मंजूर झाला असून, ही रक्कम ३८ लाख ६५ हजार रुपयांची आहे. त्याचे चार दिवसांत तहसीलदारांकडून वाटप करण्यात येणार आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील नऊ हजार ६७ शेतकऱ्यांचे १९३५.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आजरा, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, आदी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पंचनाम्यांचे काम पूर्ण करुन गेल्या आठवड्यात याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्त व मुख्य सचिवांना सादर करण्यात आला होता.अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सोमवारी (दि. १८) महसूल विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यासाठी दोन हजार ५९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ३८ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे प्रत्यक्ष आदेश आज, बुधवारी येणार आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासन स्तरावरील प्र्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम तहसीलदार कार्यालयांकडे ‘बीडीएस’द्वारे पाठविण्यात येईल.

त्यानंतर चार दिवसांत संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यावर ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. उर्वरित निधीची रक्कम टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

 

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसाkolhapurकोल्हापूर