शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महिलांमध्ये ५ तर पुरुषाच्या शरीरात ६ लिटरपर्यंत रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

कोल्हापूर : सर्वसाधारणपणे महिलांच्या शरीरात ४ ते ५ तर पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पण वैद्यकीय ...

कोल्हापूर : सर्वसाधारणपणे महिलांच्या शरीरात ४ ते ५ तर पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पण वैद्यकीय शास्त्रामध्ये रक्त लिटरमध्ये मोजण्याऐवजी किती हिमोग्लोबीन आहे, याचे मोजमाप केले जाते. हिमोग्लोबीनच्या प्रमाणावरून संंबंधित निरोगी आहे की नाही, यासंबंधीचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. निरोगी असलेल्यांनी रक्तदान केल्यानंतर त्यांच्या शरीरात काहीही फरक पडत नाही. पण रक्तदानानंतर दोन दिवस भरपूर पाणी प्यावे लागते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या नावाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त रक्तासंबंधी विविध प्रश्न कुतूहलाने विचारले जात आहेत. रक्त सर्वांच्या शरीरात असते, पण त्या व्यक्तीलाही माहीत नसते की आपल्या शरीरात किती रक्त आहे. निरोगी पुरुषाच्या शरीरात ४ ते ५ लिटर रक्त असते. पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण १३ ते १६ ग्रॅम टक्के आणि स्त्रियांमध्ये १२ ते १४ ग्रॅम टक्के असते. इतके हिमोग्लोबीनचे प्रमाण असलेले रक्तदानासाठी आल्यानंतर एकावेळी केवळ ३५० मिलिमीटरच रक्त घेतले जाते. एका पिशवीतील रक्तातून तांबड्या पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेटस, शीत अपक्षेप असे घटक वेगळे काढता येतात. गरजेनुसार यातील घटक ॲनेमिया, मलेरिया, डेंग्यू, हिमोफिलिया आणि अतिरक्तस्राव झालेल्यांना दिले जाते.

चौकट

रक्त कमी झाल्यावर कोणते आजार ?

रक्त कमी झाल्यानंतर ॲनेमिया, थॅलेसेमिया, हिमोफिलिया असे आजार होतात. अपघातामध्ये आणि महिलांमध्ये मासिकपाळी दरम्यान अति रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा येतो.

रक्त कमी होण्याची कारणे

सकस आहार न घेणे, आहारात पालेभाज्या कमी असणे, आयर्नयुक्त पदार्थ कमी खाण्यामुळे रक्त कमी होते. रक्तवाढीसाठी अधिकाधिक पालेभाज्या असलेले भोजन करायला हवे. मोड आलेले कडधान्य, गुळाची चिक्की खाल्ल्यानंतरही रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

हे रक्तदान करू शकतात

रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाणत साडेबारा टक्यापेक्षा अधिक असलेले, १०० ते १४० रक्तदाब असलेले, वजन ४५ किलोपेक्षा अधिक असलेले, पल्सरेट प्रतिमिनिट ६० ते १०० असलेले रक्तदान करू शकतात.

रक्तदान केल्यानंतरची काळजी

रक्तदान केल्यानंतर दोन दिवस उन्हात कष्टाची कामे करू नये, पाणी भरपूर प्यावे, सकस आहार घ्यावा, चांगली झोप घ्यावी, धूम्रपान आणि दारू पिऊ नये, लांबचा प्रवास टाळावे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

कोट

महिलांच्या शरीरात ४ ते ५ आणि पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. एका रक्ताच्या बॅगेतून विविध घटक वेगळे केल्यानंतर गरजेनुसार चार रुग्णांना वापरता येते.

डॉ. शिल्पा नारायणकर, रक्तपेढी प्रमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय विभागीय रक्तपेढी