शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ४८ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:19 IST

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, ...

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, मोठ्या धरणांमुळे पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १०७ गावांतून ४८ कोटी ७८ लाखांची १८५९ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शासकीय व लोकसहभागातून गाळ काढणे, शेततळे, समतल चर, आदी कामे प्राधान्याने झाल्याने सुमारे १५ हजार टी. सी. एम. (थाऊजंड क्युबिक मीटर) पाणीसाठा नव्याने झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी, राधानगरी, वारणा, तुळशी या मोठ्या प्रकल्पांसह आणखी १४ मध्यम प्रकल्पांतून पाण्याची साठवणूक होते. मुळातच जिल्हा जलयुक्त असल्याने येथे जलयुक्त शिवार योजनेची फारशी गरज नव्हती; पण जिल्ह्यातील विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे अतिपाऊस पडणाºया क्षेत्रांमध्ये जमिनी पाणथळ बनतात तर अतिशय कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पिके पाण्यासाठी ओढ धरतात. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. परंपरागत पाणी साठविण्याची आणि ते शेतीसह अन्य कामाला वापरण्याची सोय आहे; पण काळानुरूप त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे तलाव गाळाने भरून गेल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने पावसाळ्यात ओसंडून वाहणारे तलाव उन्हाळ्याच्या तोंडावर कोरडे पडतात.या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्याचा सहभाग नोंदविला. २०१५ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत १०७ गावांनी यात सहभाग घेतला. या गावांतील सर्वेक्षणानुसार ११८८ कामांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी ६० कोटी ८३ लाखांची रक्कमही मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांपैकी १८५९ कामे आजअखेर पूर्णत्वास गेली आहेत. यावर ४८ कोटी ७८ लाखांचा खर्चही करण्यात आला आहे. या कामामुळे जिथे पाऊस कमी पडतो अशा जिल्ह्यातील तालुक्यात नव्याने पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.वर्ष गावे मंजूर पूर्ण खर्च पाणीसाठा कामे कामे (लाखांत) (टी.सी.एम.)२०१५-१६ ६९ १२१२ १२१२ ३०३८.१० ७१५.४७२०१६-१७ २० ४६१ ४६१ १७.०७.९२ ९१६९.९८२०१७-२०१८ १८ २१५ १८६ १३२.२८ ४२८६.८२सन २०१८-१९ साठी या योजनेकरिता ७२ गावांची निवड झाली असून तेथे १० कोटी ५६ लाख खर्चाची ६१२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू असल्याने ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या कामांना सुरुवात होणार आहे.