शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ४८ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:19 IST

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, ...

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, मोठ्या धरणांमुळे पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १०७ गावांतून ४८ कोटी ७८ लाखांची १८५९ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शासकीय व लोकसहभागातून गाळ काढणे, शेततळे, समतल चर, आदी कामे प्राधान्याने झाल्याने सुमारे १५ हजार टी. सी. एम. (थाऊजंड क्युबिक मीटर) पाणीसाठा नव्याने झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी, राधानगरी, वारणा, तुळशी या मोठ्या प्रकल्पांसह आणखी १४ मध्यम प्रकल्पांतून पाण्याची साठवणूक होते. मुळातच जिल्हा जलयुक्त असल्याने येथे जलयुक्त शिवार योजनेची फारशी गरज नव्हती; पण जिल्ह्यातील विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे अतिपाऊस पडणाºया क्षेत्रांमध्ये जमिनी पाणथळ बनतात तर अतिशय कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पिके पाण्यासाठी ओढ धरतात. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. परंपरागत पाणी साठविण्याची आणि ते शेतीसह अन्य कामाला वापरण्याची सोय आहे; पण काळानुरूप त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे तलाव गाळाने भरून गेल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने पावसाळ्यात ओसंडून वाहणारे तलाव उन्हाळ्याच्या तोंडावर कोरडे पडतात.या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्याचा सहभाग नोंदविला. २०१५ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत १०७ गावांनी यात सहभाग घेतला. या गावांतील सर्वेक्षणानुसार ११८८ कामांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी ६० कोटी ८३ लाखांची रक्कमही मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांपैकी १८५९ कामे आजअखेर पूर्णत्वास गेली आहेत. यावर ४८ कोटी ७८ लाखांचा खर्चही करण्यात आला आहे. या कामामुळे जिथे पाऊस कमी पडतो अशा जिल्ह्यातील तालुक्यात नव्याने पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.वर्ष गावे मंजूर पूर्ण खर्च पाणीसाठा कामे कामे (लाखांत) (टी.सी.एम.)२०१५-१६ ६९ १२१२ १२१२ ३०३८.१० ७१५.४७२०१६-१७ २० ४६१ ४६१ १७.०७.९२ ९१६९.९८२०१७-२०१८ १८ २१५ १८६ १३२.२८ ४२८६.८२सन २०१८-१९ साठी या योजनेकरिता ७२ गावांची निवड झाली असून तेथे १० कोटी ५६ लाख खर्चाची ६१२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू असल्याने ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या कामांना सुरुवात होणार आहे.