शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

४७ वर्षाची प्रतिक्षा संपली ; ते सातबारे अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:47 IST

Dam Satbara Kolhapur- 'लोकमतने ' बुरंबाळी धरणग्रस्त सातबाराच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे केले. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आजच्या आज सातबारे तयार करा असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यानी ऑफिसमध्ये थांबून हे सातबाऱ्याचे काम पूर्ण केले.

ठळक मुद्दे४७ वर्षाची प्रतिक्षा संपली ; ते सातबारे अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती !ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण ;फटाक्यांची आतषबाजी

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : बुरंबाळी व नऊ नंबर ( ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्थांचा गेल्या सत्तेचाळीस वर्षाचा त्यांच्या राहत्या घराचा सातबाऱ्याचा प्रश्न आज निकाली निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन या धरणग्रस्तांना एक दिवसात त्यांच्या जमिनीचे सातबारे करण्याचे आदेश दिले. पण या घटनेला दहा दिवस उलटून गेले तरी संबंधित धरणग्रस्तांना सातबारे उतारे मिळाले नव्हते.

यावरती 'लोकमतने ' बुरंबाळी धरणग्रस्त सातबाराच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे केले. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आजच्या आज सातबारे तयार करा असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यानी ऑफिसमध्ये थांबून हे सातबाऱ्याचे काम पूर्ण केले.लोकमतने या ४६ धरणग्रस्तांची गेल्या ४४ वर्षापासूनची रखडलेली मागणी लावून धरत त्यांना त्यांच्या राहत्या घराचे हक्काचे सातबारे मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. तुळशी धरण बांधणीपासून हे शेतकरी विस्थापित ठिकाणावर वास्तव्यास आहेत. त्यांचा हा हक्काच्या सातबाराच्या लढा गेली कित्येक वर्ष चौकशीच्या प्रक्रियेत अडकला होता. या फाईलवरती गेल्या कित्येक दिवसांपासून त्रुटी निघत होत्या. दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी अचानक बुरंबाळी गावाला भेट दिली व या धरणग्रस्तांच्या मागण्या जाणून घेतल्या.तेथूनच सातबारे अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन एकच दिवसात सातबारे तयार करण्याची सूचना केली. पण दहा दिवस लोटले तरी सातबारे तयार न झाल्याने लोकमतने यावर प्रकाशझोत टाकत सातबाऱ्यासाठी धरणग्रस्तांची प्रतीक्षा या आशियाचे वृत्त प्रसारित केले व पुन्हा एकदा प्रशासनाने या सातबाराच्या कामात गती घेतली.

संध्याकाळपर्यंत सातबारे अद्यावत करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबूनच हे सातबारे पूर्ण केले. रात्री उशिरा ही बातमी बोंबाळे ग्रामस्थांना समजताच त्यांनी आपला इतक्या वर्षाचा प्रश्न निकाली निघाल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

गेल्या चव्वेचाळीस वर्षांपासून आम्ही हक्काच्या घरासाठी जो संघर्ष करत होतो, त्याला आज पूर्णविराम मिळाला. प्रशासनामुळेच आम्हाला हक्काचे सातबारे मिळाले याचा खूप मोठा आनंद आहे .- के .डी. इंगवले, अध्यक्ष, ज्योतिर्लिंग तुळशी धरणग्रस्त संघटना

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरDamधरण