शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

By राजाराम लोंढे | Updated: July 29, 2023 11:51 IST

शेतकरी हवालदिल

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात गेली आठ-दहा दिवस एकसारखा पाऊस कोसळत असल्याने सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. नदीकाठावरील ऊस, भातपिके पाण्याखाली गेली असून सर्वाधिक फटका ऊस शेतीला बसणार आहे. तब्बल ४५ हजार हेक्टरवरील ऊस पीक गेली आठ-दहा दिवस पाण्याखाली असल्याने उसाच्या शेंड्यात पाणी व माती गेल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाने जोर धरला आहे. गेली दहा दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. पंचगंगेसह इतर नद्यांवरील ७२ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्वच नद्यांचे पाणी परिसरातील शेतीत घुसले आहे. ऊस, भातपिके पाण्याखाली गेली आहेत. गेले आठ दिवस उसाचे पीक पाण्याखाली बुडाल्याने नुकसान होणार आहे. याचा सर्वाधिक फटका शिरोळ, हातकणंगले व करवीर तालुक्यांना अधिक बसणार आहे.

पूर्ण बुडालेल्या उसाला असा फटका बसतो

  • उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित ओल्या चिखलाचा थर बसल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते.
  • ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो.
  • पाण्यात बुडालेल्या कांड्याना मुळ्या फुटतात.
  • उसाला पांगशा फुटू लागतात.
  • पांगशा फुटलेला ऊस पोकळ होतो.
  • पुराच्या पाण्यात आठ दिवसांपेक्षा अधिक ऊस राहिल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. 

पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी हे करावे.

  • शिवारात साठलेले पाणी चराद्वारे बाहेर काढा.
  • उसाला पांगशा फुटल्यानंतर ऊसतोड होईपर्यंत त्या काढाव्यात.
  • ऊस कुजून वाळला तर ऊस जमिनीलगत कोयत्याने तोडून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा.
  • पूरबुडीत उसावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो.

 

उसाचे शेंडे आठ-दहा दिवस पाण्याखाली राहिले तर कुजून वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते. सर्वच नद्यांची पातळी गेले आठ दिवस स्थिर राहिल्याने धोका अधिक आहे. - डॉ. अशोक पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरFarmerशेतकरी