शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

Kolhapur: दोन महिन्यांत ४२ गावांना महानगर प्राधिकरणाचा दर्जा, मंत्री उदय सामंत यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:37 IST

आमदार चंद्रदीप नरके यांनी वेधले लक्ष

कोल्हापूर : पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या धर्तीवर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देऊन ४२ गावांचा विकास साधण्याच्या मागणीचा विचार करून पुढील दोन महिन्यांत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली.कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण नगररचनाच्या कलम ४२ अन्वये स्थापन झाले आहे. कलम ४२ अन्वये स्थापन झालेल्या प्राधिकरणाने विकास परवानगीतून निधी मिळवावा आणि तो विकास कामांवर खर्च करावा, असा नियम आहे. त्यामुळे या प्राधिकरणाला राज्य सरकारचा निधी उपलब्ध होत नाही याकडे लक्ष वेधण्याकरिता आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा उपस्थित केली.नरके यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा अडचणी सभागृहात मांडल्या. गेल्या आठ वर्षांत विकास परवानगी देऊन १२ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. परंतु एवढ्याशा उत्पन्नात प्राधिकरणातील ४२ गावांचा विकास होऊ शकत नाही. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने व कामाचा निपटारा वेळेत होत नसल्याने यापूर्वी अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शासकीय जमिनींचा उपयोग करू ..मूलभूत सुविधांसह शिक्षण, क्रीडांगण, घनकचरा, रस्ते व सांडपाणी व्यवस्थापन याकरिता नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याकरिता शासकीय जमिनी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांमध्ये शासकीय जमिनी उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे प्राधिकरणास मूलभूत सुविधा व उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याबाबतची बाब तपासण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

लोकमतच्या बातमीची दखल..प्राधिकरण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक मशीन, हालचाल रजिस्टर, अभ्यागतांची नोंदवही तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय वेळ पाळण्याबाबत लेखी सक्त सूचना देण्यात आल्या असून गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. लोकमतने या कार्यालयाचे स्टिंग ऑपरेशन करून कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याचे उघडकीस आणले होते. त्याची दखल विधानसभेत घेतली गेली.

यापूर्वीचा अनुभव वाईटआताचे प्राधिकरण स्थापन करताना तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही असेच आश्वासन दिले होते. हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरण स्थापन करून या गावांचा सूत्रबद्ध विकास करू, लागेल तेवढा निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले होते, परंतु दुर्दैवाने त्यातील पुढे काहीच घडले नाही.