शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

५० गुणासाठी ४० गुणांचा पेपर--मूल्यमापन चाचणीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:05 AM

कोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे.

ठळक मुद्देगुणदानात वाढ करण्याचा उपायपरिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले

वीरकुमार पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे. शुक्रवारी (दि. १०) मराठी माध्यमातील ७ वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची (तृतीय भाषा) प्रश्नपत्रिका ५० ऐवजी ४० गुणांची मिळाली. ही चूक लक्षात आल्यावर प्रश्नपत्रिका बदलण्याऐवजी याच प्रश्नपत्रिकेसाठी ५० गुण द्यावेत, असा आदेश काढून परीक्षेच्या हेतूलाच हरताळ फासला.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून १ ली ते ८ वी पर्यंत तीन चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या लेखी परीक्षेसाठी ५० व तोंडीसाठी १० गुण आहेत. ही चाचणी बुधवार (दि. ८) पासून सुरू झालेली आहे. शुक्रवारी मराठी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर झाला. हा पेपरही ५० गुणांचा, पण प्रश्नपत्रिका मिळाली ४० गुणांची. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.+++प्रश्न क्र. मूळ सुचविलेलेप्रश्नपत्रिकेतील गुण गुण बदलप्रश्न क्र. १ ८ ८प्रश्न क्र. २ २ ४प्रश्न क्र. ३ १६ २0प्रश्न क्र. ४ १४ १८एकूण ४0 ५0संकलित चाचणीसाठी सीलबंद प्रश्नपत्रिका येत असल्यामुळे सकाळी प्रश्नपत्रिका संच उघडल्यानंतर ४० गुणांची प्रश्नपत्रिका आहे हे लक्षात आले. त्यामुळे परिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. - सुभाष चौगले,जि. प. प्राथमिक शिक्षण अधिकारी.सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ४० गुणांची काढून गोंधळात भर पडली आहे. शासनाकडून हा बेफिकीरपणा झाला आहे. जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ या विरोधात आवाज उठवणार आहे. ही चाचणीच बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.- विलास पोवारअध्यक्ष, जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ.