शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

३७ हजार रेशनकार्ड बोगस

By admin | Published: July 17, 2017 12:33 AM

३७ हजार रेशनकार्ड बोगस

दत्ता बिडकर । लोकमत न्यूज नेटवर्कहातकणंगले : तालुक्यामध्ये १ लाख ४ हजार रेशनकार्ड कुटुंबापैकी फक्त ६३ हजार कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू असून जवळपास ३७ हजार रेशनकार्ड बोगस असण्याची शक्यता आहे. पुरवठा विभाग, धान्य दुकानदार आणि बोगस रेशनकार्ड काढून देणारे एजंट यांची साखळी या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रेशनच्या धान्य मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे तालुक्यामध्ये ३७ हजार रेशनकार्डधारकांना धान्याचा पुरवठाच होत नाही. यामुळे रेशन धान्यसाठी शासनाने सुरू केलेली बायोमेट्रीक यंत्रणा कुचकामी ठरत आहे.तालुका अडीच ब्लॉकचा असून, दोन विधानसभा या तालुक्यामध्ये येत आहेत. निलेवाडी - पारगावपासून रांगोळी - रेंदाळपर्यंत हा तालुका विस्तारला असून, सुशिक्षित कुटुंबाची संख्याही मोठी आहे. तालुक्यामध्ये एकूण १ लाख ४ हजार ५१ इतकी रेशन धान्य कुटुंब संख्या आहे. यापैकी अंत्योदय १४९९ बी.पी.एल. (दारिद्र्यरेषा) १७५१६ तर केशरी ४४६८५ अशी ६३ हजार ६०० इतकी संख्या तालुका पुरवठा विभागाकडे नोंद आहे. तर ३६ हजार ४०० इतकी रेशनकार्ड वितरीत झाली आहेत, मात्र त्यांचे धान्य कुटुंबांना मिळत नाही.रेशनकार्ड विभक्त केले किंवा या तालुक्यामधून दुसऱ्या तालुक्यामध्ये स्थलांतर झालेल्या कुटुंबांना रेशनधान्य दिलेच जात नाही. लग्न होऊन मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे नाव एखाद्या कुटुंबाने वाढवून घेतले किंवा लहान मुलाची नावे रेशनकार्ड मध्ये वाढवून घेतली तरी रेशनधान्य दुकानदार या वाढीव युनिटचे धान्य देत नाही. पुरवठा विभागाकडून धान्य आले नाही, मी कोठून देणार, अशी भाषा वापरून कार्डधारकाला गप्प करतो. पुरवठा विभागाने नाव वाढवून दिलेले असते. विभक्त कार्ड किंवा स्थलांतर कार्डचा कोटा दुकानदाराला वाढवून दिलेला असताना दुकानदार यामध्ये ढपला पाडून कार्डधारकाला मग्रुरीची आणि टोकाची भाषा वापरत असल्यामुळे रेशन धान्यासाठी दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत.शासनाने धान्य पुरवठ्यामधील गैरकारभार रोखण्यासाठी बायोमेट्रीक मिशनवर थम्पची सुविधा सुरु केली असली तरी ती कुचकामी ठरत आहे. रेशन धान्य दुकानदार कार्डधारकांना फसविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, यावर निर्बंध घालण्याची गरज आहे . (पूर्वार्ध)तालुका पुरवठा विभाग प्रत्येक महिन्याला रेशन धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य वाटपासाठी दुकानदारांना दिलेल्या कार्डकोट्याप्रमाणे शासकीय चलने रक्कम भरून घेऊन धान्य दुकानदाराला दुकानापर्यंत पोहोच करत असते, मात्र दुकानदार शासनाकडून धान्य मिळूनही रेशनकार्डधारकांना धान्य पुरवठा करत नाही. ग्रामीण भागामध्ये दोन, चार दिवस हेलपाटे मारल्यानंतर धान्य दिले जाते.