शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

कोल्हापूर जिल्ह्यातील ३५६ शासकीय वाहने भंगारात, केंद्र शासनाच्या नव्या धोरणाची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 17:46 IST

नवी गाडी येईपर्यंत कंत्राटी पद्धतीने भाड्याची गाडी वापरण्याची मुभा

कोल्हापूर : केंद्र शासनाने वाहनांच्या वापराविषयीचे नवे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार १५ वर्षे वापरात असलेली शासकीय वाहने भंगारामध्ये काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांकडील ३५६ वाहने भंगारामध्ये काढण्यात आली आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

कुठली वाहने भंगारमध्ये?वायू प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होत असल्याने पहिल्या टप्प्यात शासकीय वाहने जी १५ वर्षे वापरात आहेत ती भंगारात काढण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

३५६ शासकीय वाहने भंगारमध्ये

पोलिस, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व शासकीय विभागांकडील १५ वर्षे वापरलेली शासकीय वाहने भंगारामध्ये काढण्यात आली आहेत. हा आकडा ३५६ इतका आहे.

कंत्राटी गाड्या घेण्याची सोयज्या अधिकाऱ्याला शासनाकडून गाडी मंजूर आहे अशा अधिकाऱ्याला आधीची गाडी भंगारात गेल्यानंतर प्रक्रियेनुसार नवी गाडी येईपर्यंत कंत्राटी पद्धतीने भाड्याची गाडी वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे गाडी नाही म्हणून विभागाचे काम थांबल्याचे प्रसंग कमी आहेत. जिल्हा परिषदेत मात्र काही अधिकाऱ्यांना गाड्या नाहीत; परंतु त्यांना कंत्राटी गाड्या घेण्यास परवानगी आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांकडील १५ वर्षे वापरलेल्या गाड्या भंगारात घालण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाने एक ॲप विकसित केले असून त्यावर माहिती भरण्यात आली आहे. त्यानुसार त्याचा केंद्रीय पातळीवरूनच लिलाव केला जातो. त्यानंतर ज्या त्या ठिकाणाहून या गाड्या भंगारात घालण्यासाठी उचलल्या जातात. - राेहित काटकर, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारcarकार