शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासातून ३० हजार अद्ययावत घरे, कोल्हापूरच्या प्रगतीला बळ; बांधकाम क्षेत्राची गती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 12:53 IST

तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करणे उपयुक्त ठरणार

संतोष मिठारीकोल्हापूर : सध्या कोल्हापूर शहरात तीस वर्षांपूर्वीच्या सुमारे एक हजार इमारती आहेत. त्यांचा पुनर्विकास साधल्यास अनेक गरजूंचे गृहस्वप्न तर साकारणार आहे, त्यासह बांधकाम क्षेत्राला गती मिळून कोल्हापूरच्या प्रगतीला बळ मिळणार आहे.या इमारतींच्या पुनर्विकासातून अद्ययावत ३० हजार नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. कोरोनाने प्रत्येकाला स्वत:च्या घराचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे अनेकांची सध्या घरखरेदीच्या दिशेने पावले पडत आहेत. त्यामुळे कोल्हापुरातही घरांची मागणी वाढत आहे. महापुराचे पाणी येणाऱ्या परिसरात जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी गृहस्वप्न साकारण्यास नागरिक नकार देत आहेत.त्याऐवजी पुराचे पाणी येत नसलेल्या राजारामपुरी, टाकाळा, माळी कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरुजी वसाहत, हॉकी स्टेडियम आदी परिसराला ते प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी नव्या जागा अपेक्षा इतक्या प्रमाणात उपलब्ध नसल्याची अडचण आहे. अशा स्थितीत या परिसरातील तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करणे उपयुक्त ठरणार आहे.सध्या यातील अधिकतर इमारतींची दुरवस्था झाली आहे. तेथील रहिवासी असलेल्यांना त्या कमी पडत आहेत. त्यावर या इमारतींचा पुनर्विकास केल्याने त्यांना सध्याच्या क्षेत्रफळापेक्षा वाढीव क्षेत्रफळ, लिफ्ट, फायर सेफ्टी, कम्युनिटी स्पेस, पुरेसे पाणी आदी सुविधांसह अद्ययावत घरे मिळतील. त्यामुळे त्यांची जीवनशैली बदलण्यास मदत होईल. त्यासह या इमारतींमधील घरांची संख्या दुप्पट झाल्याने अनेक गरजूंचे गृहस्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, बांधकाम क्षेत्राला गतीया इमारतींचा पुनर्विकासाने सध्या असलेल्या १५ हजार फ्लॅटची संख्या किमान ३० हजारांवर जाईल. त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी कराच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. नव्या घरांचे काम सुरू झाल्याने बांधकाम क्षेत्राला गती मिळेल. त्यातून रोजगार निर्मिती वाढण्यास हातभार लागणार आहे.

महापालिकेने चालना द्यावीजुन्या, जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने सवलती देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१९ मध्ये घेतला आहे. त्यात दहा टक्के अधिकचे चटईक्षेत्र, आवश्यक रस्ते, शिघ्रगणकाच्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने टीडीआर देणे, प्रिमिअमचा भरण्याचे टप्पे ठरविणे आदी सवलतींचा समावेश आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देणे आवश्यक आहे.

 

  • शहरातील ३० वर्षांपूर्वीच्या इमारती : सुमारे एक हजार
  • या परिसरात आहेत इमारती : शिवाजी पार्क, माळी कॉलनी, टाकाळा, राजारामपुरी, शाहुपुरी, बेलबाग (मंगळवारपेठ)
  • पुनर्विकासातून नव्याने उपलब्ध होणारी घरे : ३० हजार

आमच्या रामसिना ग्रुपने आतापर्यंत शहरातील तीन जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. टाकाळा परिसरातील मनुस्मृती या चौथ्या प्रकल्पाची पायाभरणी आज, शुक्रवारी होणार आहे. शहरात सध्या तीस वर्षांपूर्वीच्या एक हजार जुन्या इमारती आहे. त्याचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. ते झाल्यास कोल्हापूरच्या विकासाला बळ मिळणार आहे. अनेकांचे अद्ययावत घराचे स्वप्न साकारणार आहे. एक सामाजिक बांधिलकीतून बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्विकासाचा विचार करून कोल्हापूरच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. -सचिन ओसवाल, एमडी, रामसिना ग्रुप 

तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींची दुरवस्था झाली असून, तेथे राहणे धोकादायक ठरते. बदलत्या काळानुसार या इमारतींचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. त्यातून नवीन अद्ययावत घरे उपलब्ध होतील. त्यामुळे सध्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांबरोबरच कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे. - संजय आडके, आर्किटेक्ट

टॅग्स :kolhapurकोल्हापूर