शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात शक्य

By admin | Updated: May 7, 2017 18:29 IST

७५ :२५ फॉर्म्युल्यामुळे उर्वरित रक्कम देणे बंधनकारकच : नियामक मंडळाच्या बैठकीत होणार अंतिम दर

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : उत्पन्नातील ७५ टक्के (उपपदार्थ तयार करणारे कारखाने) वाटा शेतकऱ्यांना द्यावा, हा कायदा असल्याने साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम द्यावीच लागणार आहे. एकंदरीत, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती व मानसिकता पाहता, अजून किमान प्रतिटन दोनशे ते तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतात. गेल्या गाळप हंगामातील उसाला आणखी प्रतिटन पाचशे रुपये ‘स्वाभिमानी’ची, तर एक हजार रुपयांची शेतकरी संघटनेने मागणी केली आहे.

यंदाच्या हंगामात सरासरी ३५ रुपये साखर विक्री झाली, त्याचबरोबर बगॅस, मोलॅसिसलाही चांगला भाव असल्याने कारखानदारांनी आणखी पैसे द्यावेत, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. यासाठी संघटनेच्या कारखानदारांना अल्टिमेटम दिल्याने हंगामानंतर पुन्हा ऊसदराचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला भाव आहे; पण उसाच्या तुटवड्यामुळे सर्वच कारखान्यांचे हंगाम पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत. त्यामुळे कामगारांचे पगार, मागील दोन वर्षे ‘एफआरपी’साठी काढलेले कर्जाचे हप्ते यांचा ताळमेळ घालताना कारखानदारांना कसरत करावी लागते, ही वस्तुस्थितीही आहे.

केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे एकूण उत्पन्नातील ७५ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना द्यावा आणि उर्वरित २५ टक्क्यांमध्ये व्यवस्थापन खर्च भागवावा लागणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी +१७५ रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत. कागल तालुक्यातील कारखान्यांनी यामध्ये आणखी १०० ते १२५ रुपये जादा दिलेले आहेत. साधारणत: ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक कारखान्याचा अंतिम दर वेगवेगळा निघणार आहे; पण तो सरासरी तीन हजार रुपये प्रतिटन द्यावा लागेल. आतापर्यंत कारखान्यांनी २६०० ते २८०० रुपयांपर्यंत पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन-तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत.

कारखानदारांची एकंदरीत मानसिकता व आर्थिक स्थिती पाहता बहुतांश कारखाने ही रक्कम देताना आढेवेढे घेतील, असे वाटत नाही. ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीत सर्वच कारखान्यांना आपला ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार हिशेब द्यावा लागणार आहे. साधारणत: जुलैपर्यंत ही माहिती सरकारकडे सादर करून आॅगस्टपर्यंत अंतिम दर निश्चित होऊ शकतो.

दर बसतो; पण द्यायचा कसा?

आम्ही ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार दर देणे लागतो; पण पैसे नसल्याने दर द्यायचा कसा? असा पेचही अनेक कारखान्यांसमोर आहे. गेल्या दोन हंगामांचे कर्ज डोक्यावर असताना यासाठी तरतूद कशी करायची, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.