शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात शक्य

By admin | Updated: May 7, 2017 18:29 IST

७५ :२५ फॉर्म्युल्यामुळे उर्वरित रक्कम देणे बंधनकारकच : नियामक मंडळाच्या बैठकीत होणार अंतिम दर

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : उत्पन्नातील ७५ टक्के (उपपदार्थ तयार करणारे कारखाने) वाटा शेतकऱ्यांना द्यावा, हा कायदा असल्याने साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम द्यावीच लागणार आहे. एकंदरीत, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती व मानसिकता पाहता, अजून किमान प्रतिटन दोनशे ते तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतात. गेल्या गाळप हंगामातील उसाला आणखी प्रतिटन पाचशे रुपये ‘स्वाभिमानी’ची, तर एक हजार रुपयांची शेतकरी संघटनेने मागणी केली आहे.

यंदाच्या हंगामात सरासरी ३५ रुपये साखर विक्री झाली, त्याचबरोबर बगॅस, मोलॅसिसलाही चांगला भाव असल्याने कारखानदारांनी आणखी पैसे द्यावेत, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. यासाठी संघटनेच्या कारखानदारांना अल्टिमेटम दिल्याने हंगामानंतर पुन्हा ऊसदराचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला भाव आहे; पण उसाच्या तुटवड्यामुळे सर्वच कारखान्यांचे हंगाम पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत. त्यामुळे कामगारांचे पगार, मागील दोन वर्षे ‘एफआरपी’साठी काढलेले कर्जाचे हप्ते यांचा ताळमेळ घालताना कारखानदारांना कसरत करावी लागते, ही वस्तुस्थितीही आहे.

केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे एकूण उत्पन्नातील ७५ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना द्यावा आणि उर्वरित २५ टक्क्यांमध्ये व्यवस्थापन खर्च भागवावा लागणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी +१७५ रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत. कागल तालुक्यातील कारखान्यांनी यामध्ये आणखी १०० ते १२५ रुपये जादा दिलेले आहेत. साधारणत: ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक कारखान्याचा अंतिम दर वेगवेगळा निघणार आहे; पण तो सरासरी तीन हजार रुपये प्रतिटन द्यावा लागेल. आतापर्यंत कारखान्यांनी २६०० ते २८०० रुपयांपर्यंत पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन-तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत.

कारखानदारांची एकंदरीत मानसिकता व आर्थिक स्थिती पाहता बहुतांश कारखाने ही रक्कम देताना आढेवेढे घेतील, असे वाटत नाही. ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीत सर्वच कारखान्यांना आपला ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार हिशेब द्यावा लागणार आहे. साधारणत: जुलैपर्यंत ही माहिती सरकारकडे सादर करून आॅगस्टपर्यंत अंतिम दर निश्चित होऊ शकतो.

दर बसतो; पण द्यायचा कसा?

आम्ही ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार दर देणे लागतो; पण पैसे नसल्याने दर द्यायचा कसा? असा पेचही अनेक कारखान्यांसमोर आहे. गेल्या दोन हंगामांचे कर्ज डोक्यावर असताना यासाठी तरतूद कशी करायची, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.