शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात शक्य

By admin | Updated: May 7, 2017 18:29 IST

७५ :२५ फॉर्म्युल्यामुळे उर्वरित रक्कम देणे बंधनकारकच : नियामक मंडळाच्या बैठकीत होणार अंतिम दर

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : उत्पन्नातील ७५ टक्के (उपपदार्थ तयार करणारे कारखाने) वाटा शेतकऱ्यांना द्यावा, हा कायदा असल्याने साखर कारखान्यांना उर्वरित रक्कम द्यावीच लागणार आहे. एकंदरीत, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती व मानसिकता पाहता, अजून किमान प्रतिटन दोनशे ते तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतात. गेल्या गाळप हंगामातील उसाला आणखी प्रतिटन पाचशे रुपये ‘स्वाभिमानी’ची, तर एक हजार रुपयांची शेतकरी संघटनेने मागणी केली आहे.

यंदाच्या हंगामात सरासरी ३५ रुपये साखर विक्री झाली, त्याचबरोबर बगॅस, मोलॅसिसलाही चांगला भाव असल्याने कारखानदारांनी आणखी पैसे द्यावेत, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. यासाठी संघटनेच्या कारखानदारांना अल्टिमेटम दिल्याने हंगामानंतर पुन्हा ऊसदराचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला भाव आहे; पण उसाच्या तुटवड्यामुळे सर्वच कारखान्यांचे हंगाम पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत. त्यामुळे कामगारांचे पगार, मागील दोन वर्षे ‘एफआरपी’साठी काढलेले कर्जाचे हप्ते यांचा ताळमेळ घालताना कारखानदारांना कसरत करावी लागते, ही वस्तुस्थितीही आहे.

केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे एकूण उत्पन्नातील ७५ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना द्यावा आणि उर्वरित २५ टक्क्यांमध्ये व्यवस्थापन खर्च भागवावा लागणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी +१७५ रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत. कागल तालुक्यातील कारखान्यांनी यामध्ये आणखी १०० ते १२५ रुपये जादा दिलेले आहेत. साधारणत: ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक कारखान्याचा अंतिम दर वेगवेगळा निघणार आहे; पण तो सरासरी तीन हजार रुपये प्रतिटन द्यावा लागेल. आतापर्यंत कारखान्यांनी २६०० ते २८०० रुपयांपर्यंत पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन-तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत.

कारखानदारांची एकंदरीत मानसिकता व आर्थिक स्थिती पाहता बहुतांश कारखाने ही रक्कम देताना आढेवेढे घेतील, असे वाटत नाही. ऊस दर नियामक मंडळाच्या बैठकीत सर्वच कारखान्यांना आपला ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार हिशेब द्यावा लागणार आहे. साधारणत: जुलैपर्यंत ही माहिती सरकारकडे सादर करून आॅगस्टपर्यंत अंतिम दर निश्चित होऊ शकतो.

दर बसतो; पण द्यायचा कसा?

आम्ही ७५ : २५ फॉर्म्युल्यानुसार दर देणे लागतो; पण पैसे नसल्याने दर द्यायचा कसा? असा पेचही अनेक कारखान्यांसमोर आहे. गेल्या दोन हंगामांचे कर्ज डोक्यावर असताना यासाठी तरतूद कशी करायची, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.