शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दीड महिन्यामध्ये कोल्हापूर सीपीआरमध्ये २८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:25 IST

याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

ठळक मुद्देगंभीर रुग्ण सीपीआरमध्ये आणले गेल्याने येथील मृत्यू पावलेल्यांची संख्या गेल्या दीड महिन्यात २८ इतकी झाली आहे.

कोल्हापूर : सीपीआरमध्ये कोरोना संशयित रुग्णांची तपासणी सुरू झाल्यापासून कोरोना व्यतिरिक्त २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यूमोनिया, हृदयविकार, श्वसनाचा त्रास, अर्धांगवायू, निकामी झालेले फुप्फुस आदी कारणांनी हे मृत्यू झाले आहेत. दक्षता म्हणून यातील २७ जणांच्या घशातील स्राव घेण्यात आले होते. मात्र, ते देखील निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.सीपीआरमध्ये ११ मार्चपासून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी आणि त्यांच्या घशातील स्राव घेण्याचे काम सुरू करण्यात आले. काही कालावधीनंतरकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आणि सीपीआर हे कोरोना विशेष उपचार रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.याउलट अनेक खासगी रुग्णालयांनी गंभीर झालेले रुग्ण कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे पाठवायला सुरुवात केली. हृदयविकारापासून अर्धांगवायू झालेले रुग्णही कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे रात्री अपरात्री पाठविले जाऊ लागले. तसेच याच दरम्यान काही खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी पैशाचीही मागणी केली. परिणामी, असे रुग्ण सीपीआरकडे येऊ लागले.त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना हा निर्णय बदलून पुन्हा सीपीआरमध्ये रुग्णांची सोय करणे भाग पडले. त्यामुळे अगदी परवापर्यंत अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना सीपीआरकडे पाठवून देण्याची पद्धत पडली आहे. कोणत्याही प्रकारचा रुग्ण समोर आल्यानंतर शासकीय दवाखाना रुग्णाला नाकारू शकत नसल्याने सीपीआरच्या वैद्यकीय पथकांनीही आता प्रसूती, बालरोग विभाग, डायलेसिस, विषबाधा विभाग, हृदयविकार विभाग सुरू करून आपले काम सुरू ठेवले आहे. परंतु असे अनेक गंभीर रुग्ण सीपीआरमध्ये आणले गेल्याने येथील मृत्यू पावलेल्यांची संख्या गेल्या दीड महिन्यात २८ इतकी झाली आहे.रुग्ण आणि नातेवाईकांना मनस्तापखेडेगावातून आलेल्या अनेक रुग्णांची सीपीआरमधील अन्य विभाग बंद केल्यानंतर गैरसोय झालीच. परंतु त्यांना मनस्तापही सहन करावा लागला. हे सर्वजण पहिल्यांदा सीपीआरमध्ये येत असत. तेथे अन्य विभाग बंद केल्यानंतर मग त्यांना लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयाकडे जाण्यास सांगितले जाई. तेथे गेल्यानंतर तेथून संदर्भ चिठ्ठी घेऊन खासगी रुग्णालयाला पाठविले जाई. परंतु काही ठिकाणी दाखल करून घेताना विलंब होत असल्याने अनेकजण पुन्हा सीपीआरकडे येत होते.

टॅग्स :Deathमृत्यूCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर