शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

Kolhapur: जिल्हा नियोजनला संपवायचे आहेत तब्बल २४० कोटी, अजून ५० टक्के निधी खर्चाविना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:50 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीला आर्थिक वर्षाची अखेर मार्च नव्हे तर फेब्रुवारी अखेरपर्यंतच करावी लागणार ...

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीला आर्थिक वर्षाची अखेर मार्च नव्हे तर फेब्रुवारी अखेरपर्यंतच करावी लागणार आहे. आत्तापर्यंत वार्षिक योजनेचा २४० कोटी म्हणजे ५० टक्के निधी खर्च झाला असून, उर्वरित ५० टक्के निधी २५ फेब्रुवारीपर्यंतच संपविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रस्ताव येण्यास सुरूवात झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निधीचा प्रस्ताव देण्यात जिल्हा परिषद मागे आहे. जिल्हा परिषदेचे आत्तापर्यंत ३८ कोटीच खर्च झाले आहेत.

लोकसभा निवडणूक या महिन्याच्या अखेरीला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. एकदा आचारसंहिता लागू झाली की, कोणतीही कामे करता येत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता असते. गेल्यावर्षी जवळपास ६ काेटी रुपये परत गेले होते. यंदा असे होऊ नये, यासाठी डिसेंबरपासूनच राज्य शासनाने सर्व विभागांना फेब्रुवारीपर्यंत निधी संपविण्याची सूचना केली आहे. जिल्ह्याचा वार्षिक आराखडा ४८० कोटींचा असून, आत्तापर्यंत त्यापैकी २४० कोटी निधी खर्च झाला आहे. उर्वरित २४० कोटी खर्च करण्यासाठी विभागाकडे १५ ते २० दिवसच राहिले आहेत.

आचारसंहिता लागू होईपर्यंत विकासकामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळून वर्कऑर्डरपर्यंतची प्रक्रिया झाली की, पुढे आचारसंहितेच्या काळातही कामे करता येतात. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व आमदारांचे स्वीय सहायक, ठेकेदार यांच्या जिल्हा नियोजनच्या कार्यालयातील फेऱ्या वाढल्या असून, प्रस्ताव येण्यास सुरूवात झाली आहे.

नियोजनच्या अर्थकारणावर एक नजर

  • वार्षिक आराखडा : ४८० कोटी
  • पहिल्या टप्प्यात आलेला निधी : ३३६ कोटी (शासकीय नियमानुसार ६० टक्के म्हणजे २०१ कोटी वेळेत खर्च)
  • ५ फेब्रुवारीला आलेला उर्वरित निधी : १४४ कोटी 

१०९ कोटींचे प्रस्ताव अपेक्षित जिल्हा परिषदेला दोन वर्षे निधी खर्च करता येत असल्याने त्यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रस्ताव येण्यास उशीर होत आहे. रस्ते, जनसुविधा आणि यात्रास्थळ या विकासकामांचे प्रस्ताव अजून आलेले नाहीत. वार्षिक आराखड्यातील रकमेपैकी जिल्हा परिषदेकडून १०९ कोटींचे प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. मात्र, आत्तापर्यंत फक्त ३८ काेटी म्हणजे ३० टक्केच निधी खर्ची पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPlanning Commissionनियोजन आयोग