शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कंटेनर-बस अपघातात २३ जखमी

By admin | Updated: October 8, 2015 00:29 IST

सहा गंभीर : खंडाळा येथे महामार्गावर पहाटे भीषण दुर्घटना

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर कंटेनर व खासगी प्रवासी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात बसमधील सहाजण गंभीर, तर बसचालकासह १७ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे साडेचार वाजता झाला.खासगी प्रवासी वाहतूक करणारी आराम बस (पीवाय०१ सीएफ २८४७) बंगलोरहून मुंबईकडे निघाली होती. यावेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते. राजू हेमंत रेड्डी हा बस चालवित होता. तर दुसरा चालक कल्याणगौडा शंकरगौडा बरमगौडा हा आराम करीत होता. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत कोल्हापूरहून येणारा कंटेनर (एमएच ४६ एएफ ३८७३) अचानकपणे वळल्याने पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या खासगी प्रवासी बसची भीषण धडक बसली. यामध्ये बसमधील बसचालक राजू हेमंत रेड्डी (वय ४४, रा. शिवा कॉलनी, गोपगप्पा, ता. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक), क्लिनर वीरण्णा रकसणी (२६, रा. धारवाड, कर्नाटक), मुदगण कृष्णा (४६, रा. कामरान रोड, बंगलोर), चिराग रामशूर बक्षी (३६, रा. बाणेर-पुणे), प्रमोद रामेश्वर गिरी (३८, रा. भोसरी, पुणे), रामकुमार मुंदेवरम स्वामीराव (५४, रा. कामरान रोड, बंगलोर) हे गंभीर जखमी झाले, तर लता वसंत कुलकर्णी (६६, रा. पुणे), रमाकांत वसंत कुलकर्णी (३९, रा. पुणे), सिद्धार्थ रमाकांत कुलकर्णी (७, रा. पुणे), कुर्माराव सीमाचरण वीजपड्डी (२७, रा. मध्यमपालम, विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश), मोनिशा व्यंकटेश्वर नायडू (२३, रा. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश), भरत चतुराम कुमावत (३२, रा. धुरवडी, ता. शिव, जि. बाडनेर, राजस्थान), प्रमोद दिगंबर कोलम (४१, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) तर इतर तीन किरकोळ जखमी झाले. कंटेनरचालक गणेश नामदेव वाघमोडे (२६, रा. पळसमंडळ, चव्हाणवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हाही जखमी झाला. (प्रतिनिधी)