शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जयसिंगपूर येथे आज २१ वी ऊस परिषद, स्वाभिमानी आंदोलनाचे रणशिंग फुंकणार

By ओमकार संकपाळ | Updated: October 15, 2022 11:16 IST

गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व ज्यादाचा दर या तीन मुद्द्यांवर आंदोलनाची दिशा या ऊस परिषदेत ठरणार

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी २१ वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होत आहे. गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व ज्यादाचा दर या तीन मुद्द्यांवर आंदोलनाची दिशा या ऊस परिषदेत ठरणार आहे. त्यामुळे या परिषदेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर साखर कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी स्वाभिमानीने नियोजन केले असून, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून महापूर, कोरोना, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी स्वाभिमानीने केली होती. एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राजू शेट्टी यांनी ‘जागर एफआरपीचा, संघर्ष ऊस दराचा’ यातून दौरे केले आहेत. ऊस परिषदेची जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या परिषदेकडे राज्यासह सीमाभागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, शुक्रवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस परिषद ठिकाणाची पाहणी केली. शिवाय पार्किंग, बैठक व वाहतूक नियोजनही निश्चित करण्यात आले. या परिषदेत राजू शेट्टी यांच्यासह प्रा. जालंदर पाटील, संदीप जगताप, सावकर मादनाईक, प्रकाश पोपळ, सतीश काकडे, पृथ्वीराज जाचक आदी मार्गदर्शन करणार आहेत. ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, मादनाईक पेट्रोल पंप, झेले चित्रमंदिर याठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना