शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील २१ गावे, १00 वाड्यावस्त्यांवर स्मशानशेडचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:21 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २१ गावे, १00 वाड्यावस्त्यांवर स्मशानशेडचा अभावजागाच उपलब्ध नसल्याने निधी जातोय परत, विशेष प्रयत्नांची गरज

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील १0२७ ग्रामपंचायतींपैकी २१ गावे आणि १00 वाड्यावस्त्या या सुविधेपासून वंचित आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या सहा वर्षांमध्ये प्राधान्याने स्मशानभूमीतील शेड, रस्ते, संरक्षक भिंती यावर मोठा खर्च केला आहे. या २१ गावांमधील स्मशानभूमीसाठीही निधी मंजूर करण्यात आला होता; मात्र या ठिकाणी सार्वजनिक जागाच उपलब्ध नसल्याने, जी जागा आहे ती सर्वांच्या वहिवाटीसाठी सुलभ नसल्याने या गावांमध्ये अजूनही स्मशानभूमीचे काम मार्गी लावता आलेले नाही.

प्रकाश आबिटकर यांनी मांडला अधिवेशनात मुद्दाआमदार प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी नागपूर येथे अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला. दरडोई उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागणे दुर्देवी असल्याचे सांगत तारांकित प्रश्नाद्वारे त्यांनी हा प्रश्न मांडला.प्राधान्याने निधी देऊ - पंकजा मुंडेआमदार आबिटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये स्मशानभूमींसाठी मोठा निधी दिला आहे; मात्र जागांअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी हे काम झालेले नाही. येत्या दोन वर्षांत उर्वरित गावांसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले.

हे करता येईलकोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक कामासाठी पदरमोड करण्याची परंपरा आहे. गावच्या शाळेसाठी, मंदिरासाठी तसेच स्मशानभूमीसाठीही अनेक दानशूर ग्रामस्थांनी आपल्या जागा दिल्या आहेत. याचाच कि त्ता गिरवत या २१ गावांमधील तसेच १00 वाड्यावस्त्यांवरील दानशूर नागरिकांनी गावाशेजारी सर्वांना सोयीची असणारी केवळ २ गुंठे जागा जर दिली तर गावचा एक अतिशय कळीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

स्मशानभूमीसाठी अशी जागा देणाऱ्या दानशूर ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेने विशेष गौरव करण्याची गरज आहे. अगदीच अडचण असेल तर ग्रामपंचायतीने दानशूर नागरिकांच्या मदतीतून अशी जागा खरेदी करण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर