शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील २१ गावे, १00 वाड्यावस्त्यांवर स्मशानशेडचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:21 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २१ गावे, १00 वाड्यावस्त्यांवर स्मशानशेडचा अभावजागाच उपलब्ध नसल्याने निधी जातोय परत, विशेष प्रयत्नांची गरज

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील १0२७ ग्रामपंचायतींपैकी २१ गावे आणि १00 वाड्यावस्त्या या सुविधेपासून वंचित आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या सहा वर्षांमध्ये प्राधान्याने स्मशानभूमीतील शेड, रस्ते, संरक्षक भिंती यावर मोठा खर्च केला आहे. या २१ गावांमधील स्मशानभूमीसाठीही निधी मंजूर करण्यात आला होता; मात्र या ठिकाणी सार्वजनिक जागाच उपलब्ध नसल्याने, जी जागा आहे ती सर्वांच्या वहिवाटीसाठी सुलभ नसल्याने या गावांमध्ये अजूनही स्मशानभूमीचे काम मार्गी लावता आलेले नाही.

प्रकाश आबिटकर यांनी मांडला अधिवेशनात मुद्दाआमदार प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी नागपूर येथे अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला. दरडोई उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागणे दुर्देवी असल्याचे सांगत तारांकित प्रश्नाद्वारे त्यांनी हा प्रश्न मांडला.प्राधान्याने निधी देऊ - पंकजा मुंडेआमदार आबिटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये स्मशानभूमींसाठी मोठा निधी दिला आहे; मात्र जागांअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी हे काम झालेले नाही. येत्या दोन वर्षांत उर्वरित गावांसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले.

हे करता येईलकोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक कामासाठी पदरमोड करण्याची परंपरा आहे. गावच्या शाळेसाठी, मंदिरासाठी तसेच स्मशानभूमीसाठीही अनेक दानशूर ग्रामस्थांनी आपल्या जागा दिल्या आहेत. याचाच कि त्ता गिरवत या २१ गावांमधील तसेच १00 वाड्यावस्त्यांवरील दानशूर नागरिकांनी गावाशेजारी सर्वांना सोयीची असणारी केवळ २ गुंठे जागा जर दिली तर गावचा एक अतिशय कळीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

स्मशानभूमीसाठी अशी जागा देणाऱ्या दानशूर ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेने विशेष गौरव करण्याची गरज आहे. अगदीच अडचण असेल तर ग्रामपंचायतीने दानशूर नागरिकांच्या मदतीतून अशी जागा खरेदी करण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर