शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील २१ गावे, १00 वाड्यावस्त्यांवर स्मशानशेडचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:21 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील २१ गावे, १00 वाड्यावस्त्यांवर स्मशानशेडचा अभावजागाच उपलब्ध नसल्याने निधी जातोय परत, विशेष प्रयत्नांची गरज

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील १0२७ ग्रामपंचायतींपैकी २१ गावे आणि १00 वाड्यावस्त्या या सुविधेपासून वंचित आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या सहा वर्षांमध्ये प्राधान्याने स्मशानभूमीतील शेड, रस्ते, संरक्षक भिंती यावर मोठा खर्च केला आहे. या २१ गावांमधील स्मशानभूमीसाठीही निधी मंजूर करण्यात आला होता; मात्र या ठिकाणी सार्वजनिक जागाच उपलब्ध नसल्याने, जी जागा आहे ती सर्वांच्या वहिवाटीसाठी सुलभ नसल्याने या गावांमध्ये अजूनही स्मशानभूमीचे काम मार्गी लावता आलेले नाही.

प्रकाश आबिटकर यांनी मांडला अधिवेशनात मुद्दाआमदार प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी नागपूर येथे अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला. दरडोई उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागणे दुर्देवी असल्याचे सांगत तारांकित प्रश्नाद्वारे त्यांनी हा प्रश्न मांडला.प्राधान्याने निधी देऊ - पंकजा मुंडेआमदार आबिटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये स्मशानभूमींसाठी मोठा निधी दिला आहे; मात्र जागांअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी हे काम झालेले नाही. येत्या दोन वर्षांत उर्वरित गावांसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले.

हे करता येईलकोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक कामासाठी पदरमोड करण्याची परंपरा आहे. गावच्या शाळेसाठी, मंदिरासाठी तसेच स्मशानभूमीसाठीही अनेक दानशूर ग्रामस्थांनी आपल्या जागा दिल्या आहेत. याचाच कि त्ता गिरवत या २१ गावांमधील तसेच १00 वाड्यावस्त्यांवरील दानशूर नागरिकांनी गावाशेजारी सर्वांना सोयीची असणारी केवळ २ गुंठे जागा जर दिली तर गावचा एक अतिशय कळीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

स्मशानभूमीसाठी अशी जागा देणाऱ्या दानशूर ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेने विशेष गौरव करण्याची गरज आहे. अगदीच अडचण असेल तर ग्रामपंचायतीने दानशूर नागरिकांच्या मदतीतून अशी जागा खरेदी करण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर