शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

kolhapur: कोरोना गेला, हक्काचे मानधनही जाणार का?; कंत्राटी कर्मचारी, पुरवठादारांचे २१ कोटी रुपये थकीत

By समीर देशपांडे | Updated: August 4, 2023 17:15 IST

रुग्णवाहिका चालकांचे १६ महिन्यांचे वेतन थकले

समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी पडेल ती कामे केली, अगदी मृतदेह उचलण्यापासून ज्यांना कोणीच नाही अशांना बरे करून घरी पाठवेपर्यंत सेवा दिली. अनेक पुरवठादारांनी केवळ अधिकाऱ्यांच्या शब्दावर कोट्यवधींचे साहित्य आणून पोहाेच केले; परंतु या सगळ्यांची दोन वर्षांची २१ कोटी रुपयांचे मानधन आणि देयके मिळाली नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.२०२० आणि २०२१ मध्ये कोरोनाच्या दोन लाटांमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती करण्यात येत होते. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कोविड सेंटर्सही सुरू करण्यात आली. या ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले.अगदी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर किटपासून ते त्या-त्या सेंटर्सच्या ठिकाणी पाण्याच्या सुविधेपासून ते प्लंबिंगच्या कामापर्यंत, औषधांच्या पुरवठ्यापासून ते संगणक यंत्रणा उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या अनेक कामांचा यामध्ये समावेश होता. त्याचबरोबर वाढत्या रुग्णांना हाताळण्यासाठी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपासून ते अगदी मृतदेह उचलण्यासाठीही जादाचे मनुष्यबळ घ्यावे लागले.

नवीन प्रयोगशाळा, टेस्टिंग किटचे तब्बल १ कोटी ६० लाख रुपये देणे आहे, सुमारे साडेआठशे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या काळात आपली सेवा दिली आहे. मात्र, पहिल्या लाटेतील तीन महिन्यांचे आणि दुसऱ्या लाटेतील ४ महिन्यांचे त्यांचे मानधन दोन वर्षे होत आली तरी अजूनही अदा करण्यात आलेले नाही. केवळ या कर्मचाऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपयांचे मानधन थकीत आहे. शासनाने तातडीने निधीचा पुरवठा करून ही रक्कम अदा करण्याची मागणी होत आहे.

परत हाक मारली तरी येणार नाही

आपत्तीच्या काळात कोल्हापूरमध्ये मदतीला कोणी नाही म्हणत नाही. परंतु, अशा पद्धतीने जेव्हा घरातील मंडळीही स्मशानभूमीत जायला तयार नव्हती अशावेळी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. परंतु, त्यांना आणि ज्यांनी गरजेच्या वेळी वस्तूंचा पुरवठाही केला त्यांनाही शासनाने निधी न देता फाट्यावर मारले आहे.

मंत्री, अधिकारी काय करतात?ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला तेव्हा हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्रिपदी होते, पालकमंत्री सतेज पाटील होते, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर होते. या तिघांनीही कोणत्याही सुविधेत कमतरता पडू देऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या. असे असताना कोरोना संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना आणि पुरवठादारांना या नेत्यांसह अधिकाऱ्यांनीही वाऱ्यावर का सोडले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रेमडेसिविरचे ८० लाख थकलेगंभीर आजारी असलेल्या कोरोना रुग्णांना रेमडेसिविर द्या म्हणून खासदार, आमदार सातत्याने जिल्हा परिषदेत फोन करीत होते. अगदी सर्वसामान्यांनाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत रेमडेसिविर मिळाले. परंतु, कंपनीचे मात्र अजूनही ८० लाख रुपये थकले आहेत.

रुग्णवाहिका चालकांचे १६ महिन्यांचे वेतन थकलेजिल्हा परिषदेत प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील १०२ राष्ट्रीय रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या चालकांचे १६ महिन्यांचे वेतन थकले आहे. शासनाकडून निधी न आल्यामुळे हे वेतन थकल्याचे सांगण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर १०२ राष्ट्रीय रुग्णवाहिका या ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. कोरोना काळामध्ये जीव धोक्यात घालून काम केलेले हे चालक गरोदर मातांना २४ तास संदर्भ सेवा देणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ने आण करणे, नवजात शिशु पूर परिस्थिती आपत्कालीन रुग्ण यांना रात्री-अपरात्री सेवा देण्याचे काम करीत असतात. परंतु, या वाहन चालकांना गेली १६ महिने त्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या सर्वांनी नुकतीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन लवकरात लवकर वेतन अदा करण्याची विनंती केली आहे. अनेकांच्या घरी वयोवृद्ध नागरिक असून, कर्जाचे हप्तेही वेळेमध्ये भरणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे चालक हतबल झाले आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या