शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात होणार २००० कोटींची गुंतवणूक, राज्यभरातील १०४ उद्योजकांनी घेतले भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:36 IST

कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : देश-परदेशातील नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उद्योजक कोल्हापुरात १९१८ कोटींची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये एकूण १०४ भूखंड घेतले आहेत. त्यांनी उद्योग सुरू केल्यानंतर ७००४ जणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या दीड वर्षांत किती उद्योजकांनी पाऊले टाकली ते ‘लोकमत’ने जाणून घेतले. कुशल मनुष्यबळ, चांगले वातावरण, औद्योगिक परंपरेमुळे कोल्हापुरात उद्योग, व्यवसायाचा विस्तार, नवी सुरुवात करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांचे प्रमाण अधिक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी अधिक आहे.जानेवारी २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत एमआयडीसी विभागाने विविध उद्योजकांना शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, गडहिंग्लज, हलकर्णी या एमआयडीसींमध्ये १०४ भूखंडांचे वाटप केले आहे. त्यात कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, आदी जिल्ह्यांतील उद्योजकांचा समावेश आहे. कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.भूखंड घेतलेल्यांपैकी तीन कंपन्यांनी कागल-पंचतारांकित एमआयडीसीत बांधकामाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यात साऊंड कास्टिंग, सुनील प्लास्टिक, डेल्टा इरिगेशन एलएलपी यांचा समावेश आहे. या कंपन्यांद्वारे २२५ कोटींची गुंतवणूक आणि १ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. येत्या दोन वर्षांत टप्प्या-टप्याने या नव्या उद्योगांची सुरुवात होईल.

नव्या तीन ‘एमआयडीसी’ होणारजिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शिरोळ या तालुक्यांमध्ये नव्या तीन एमआयडीसी होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया एमआयडीसी विभागाने सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड मागणी करणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. त्यात राज्यभरातील उद्योजक आहेत. त्यांना भूखंड आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी आमचा वरिष्ठ कार्यालय, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. -राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी कोल्हापूर

सध्याचे औद्योगिक क्षेत्र दृष्टिक्षेपात...

एमआयडीसी  - उद्योगांची संख्याशिरोली              १०००गोकुळ शिरगाव     ८००शिवाजी उद्यमनगर  ८५०कागल-हातकणंगले ४५०

टॅग्स :kolhapurकोल्हापूर